AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावागावात मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तयारी, जेवणाचा मेनू ठरला, पालक पुरी अन्…

मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याची तयारी जोरात सुरु आहे. ठिकठिकाणी आंदोलकांना नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गावागावात मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तयारी, जेवणाचा मेनू ठरला, पालक पुरी अन्...
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 25, 2025 | 8:57 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहे. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून ते बेमुदत आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याची तयारी जोरात सुरु आहे. ठिकठिकाणी आंदोलकांना नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आंदोलकांना नाश्त्यासाठी काय मिळणार?

मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आंदोलकांची लगबग सुरू झाली आहे. अंतरवाली सराटी जवळील साष्ट पिंपळगाव येथे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलकांच्या नाश्त्या पाण्यासाठी गरमा गरम पालक पुऱ्यांची आणि चटणीची सोय करण्यात आली आहे. आजपासून ही तयारी सुरू झाली असून मुंबई मार्गावर जाणाऱ्या सर्व आंदोलकाना निघताना या नाश्त्याचा आस्वाद घेता येणार आहे. स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी आचारी लावून ही सोय केली आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी आणि रस्त्यातही आंदोलकांना नाश्ता आणि जेवण देण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यामधून उद्या मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे निघणार

29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठी तयारी केली आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या आंतरवालीकडे मराठा कार्यकर्ते रवाना होणार आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला आहे.

पहिला मुक्काम शिवनेरीवर

मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा मार्ग सांगितला आहे. 27 तारखेला आंतरवाली सराटी मधून आम्ही बाहेर पडणार आहोत पैठण, शेवगाव, पांढरीपुल, अहिल्यानगर, आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर राहील. 26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक आहे, अन्यथा एकदा अंतरवाली सराटी सोडली तर नंतर चर्चा करणार नाही. थेट मुंबईमध्ये गेल्यावर चर्चा करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता फडणवीस आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.