AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : माझा गेम करण्याचा प्लान, मनोज जरांगे यांचे मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक सुरू आहे. मराठा समाजासोबत ही शेवटी बैठक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अजूनही आग्रही आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे. आज घेत असलेल्या या निर्णायक बैठकीत त्यांनी सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

Manoj Jarange : माझा गेम करण्याचा प्लान, मनोज जरांगे यांचे मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप
मनोज जरांगेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 25, 2024 | 2:06 PM
Share

सातारा :  ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज ते मराठा आरक्षणासंबंधी निर्णायक आणि शेवटची बैठक घेत आहेत. या बैठकीत त्यांनी सरकारमधील नेत्यांचे थेट नाव घेत टोकाचे आरोप केले. मराठा समाज कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभिर आरोप केले आहेत. मला संपवण्याचा प्रयत्त्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर कोणकोणते नेते?

मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक सुरू आहे. मराठा समाजासोबत ही शेवटी बैठक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अजूनही आग्रही आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे. आज घेत असलेल्या या निर्णायक बैठकीत त्यांनी सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा सरकारचा प्लान असल्याचं ते म्हणाले. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील दोन आमदार आणि अजित पवार गटातील दोन आमदारांचा कट असल्याचं ते म्हणाले.

माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. याच कारणामुळे मी सलाईन घेणं बंद केलं असल्याचं जरांगे म्हणाले. सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे त्यांना कसही करून मला संपवाचं आहे, यामध्ये सरकारमधील मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा आरोप आणि गंभीर आरोप आहे.  देवेंद्र फडणवीय यांना माफी मागावी लागली त्यामुळे ते राग काढत असल्याचेही जरांगे म्हणाले.

Follow Us
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.