AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल

महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला.

सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जलील यांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती.
| Edited By: | Updated on: Oct 18, 2020 | 1:02 PM
Share

नवी मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात एमआयएम (MIM) पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला. यावेळी अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष भाजपवर घणाघाती टीका केली आहे. (mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)

देशात गंभीर प्रश्न असताना त्यावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप, आरएसएस बजरंग दल एक सुनियोजित कट रचून देशात हिंदू, मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. एमआयएम प्रणित विद्यार्थी आघाडीच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त नवी मुंबई कामोठमध्ये प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भाजप मुळ मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, देशातील जनता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे. त्यामुळे भाजपच्या असल्या भूलथापांना यापुढे बळी पडणार नाही असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं. (mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)

मागील पाच वर्षे राज्यात भाजपचं सरकार होतं. मात्र, तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप मूळ मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्द्यांना हात घालत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करून दाखवून द्यावं. नाहक नागरीकांचे लक्ष विचलित करू नये असं देखील जलील यांनी सुनावलं.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण, फैयाज अहमद, महासचिव शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डा.कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी, सानीर सय्यद, मझर पठाण आदी बडे नेते आणि राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते.

इतर बातम्या –

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, सोमवारपासून लागू होणार नवा नियम

मुंबईत उद्यापासून मेट्रो सुरु; जाणून घ्या काय असतील नियम

(mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.