AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर टीका, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत पलटवार केलाय.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर टीका, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता
MP Imtiaz JalilImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 28, 2024 | 8:27 PM
Share

परभणी | 28 जानेवारी 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्ण येथे संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र, या सोहळ्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत पलटवार केलाय.

परभणी येथील संविधान गौरव सोहळ्यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेतील एक उदाहरण दिले. आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे 360 खासदार यांच्यासमोर सांगितले की देशामध्ये केवळ एकच महापुरुष झाले आणि ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते असे सांगितले.

भाजपच्या नेत्यांनी ते मान्य केले नाही. कारण, त्यांच्या मते देशात एकच महापुरुष आहेत ते म्हणजे सावरकर. पण, ‘ऐसे भगोडे को ना हमने कभी माने है न कभी मानेगे.’ असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकर यांच्यावर टीका केली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या या विधानाचे राज्यात राजकीय पडसाद उमटले आहेत. शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ही औरंगजेबाची अवलाद आहे, निजामाची अवलाद आहे. त्यांना सावरकरांबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. मात्र, दुर्दैव तेव्हा आपलेच लोक बोलतात. या निजामाच्या औलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. सावरकर राज्याचेच नव्हे देशाचे दैवत आहेत अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली.

भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेला उत्तर दिलंय. त्यांनी म्हणायचं की नाही म्हणायचं हा त्यांचा व्यक्ती भाव आहे. हा देश सावरकरांना मानतो आणि सावरकरांना मानत असताना त्यांनी मानले नाही म्हणून काही स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य योद्धा सावरकर यांचे महत्त्व कमी होणार आहे का? असा सवाल केला. ते राजकारणासाठी तसं बोलतात. मताच्या दृष्टिकरणासाठी ते बोलतात. हा देश मात्र स्वातंत्र्य सावरकरांचे ऋण एकदाही विसरू शकत नाही असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, एमआयचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपचे अंतर्गत संगनमत आहे. त्यामुळे भाजपने त्यांना बोलायला सांगायचे आणि त्यांनी बोलायचं असा प्रकार पहिल्यापासूनच सुरू असल्याचा आरोप केला.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला