AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्या विधानाचा आधार घेत संतोष बांगर यांची जहरी टीका, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांचा भाऊ ही…

विधीमंडळ चोरमंडळ असल्याची टीका संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपसह शिवसेना पक्ष विधानभवनात आक्रमक झाला आहे. त्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया देत असतांना संतोष बांगर यांनी जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांच्या विधानाचा आधार घेत संतोष बांगर यांची जहरी टीका, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांचा भाऊ ही...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 01, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने 288 आमदारांना निवडून दिले आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यावर बोलत असतांना 288 आमदार चोर असल्याचं म्हणत आहे. त्यात उद्धव ठाकरे येतात, आदित्य ठाकरे येतात आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊतही येतात. नितेश राणे यांनी जसं सांगितलं की दहा मिनिट सुरक्षा बाजूला ठेवा जनता यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही. त्यांनी माफी मागून जमणार नाही. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे आमदार संतोष बांगर ( santosh bangar ) यांनी म्हंटलं आहे. संतोष बांगर यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत असतांना ठाकरे पितापुत्राला टोला लगावला आहे.

संजय राऊत आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतांना संजय राऊत यांनी विधीमंडळ पक्ष चोरमंडळ असल्याचं वादग्रस्त विधान केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर भाष्य करत असतांना संजय राऊत यांनी जहरी टीका केली होती.

त्यानंतर भाजपसह शिवसेना पक्षाने संजय राऊत यांच्या या विधानावरुन आक्रमक भूमिका घेत. हक्कभंगाचा ठराव आणण्याची तयारी केली होती. त्यादरम्यान हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर भाष्य केली आहे.

विधानभवनात आणि विधानपरिषदेत दोन्ही सभागृहात संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. विधीमंडळावर संजय राऊत यांनी केलेल्या भाष्यावरून सभागृहात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

8 मार्चला याबाबत चौकशी करून निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई केली जाते. चौकशीला संजय राऊत सामोरे जातात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊत यांनी व्हीपच्या मुद्द्यावर बोलत असतांना चाळीस आमदारांवर टीका करत असतांना विधीमंडळ चोर मंडळ म्हंटले आहे. त्यामुळे संपूर्ण सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

याच दरम्यान निलेश राणे यांनी केलेल्या टीकेचा आधार घेत आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांना सुरक्षा देऊ नका दहा मिनिटे मोकळे सोडा जनता त्यांना ठेचून काढेल असं म्हंटलं आहे.

याशिवाय ज्या विधिमंडळाला चोर म्हंटलं आहे त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्वतःचे भाऊ सुनील राऊत आहे असं म्हणत संजय राऊत यांच्या विधानावरून संतोष बांगर यांनी टोला लगावला आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?