AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनसे हा परिवार, सहज तुटणार नाही’, 320 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर राजू पाटालांचं मोठं विधान

"मनसे हा परिवार आहे. तो सहज तुटणार नाही. नाराजीतून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या घटना घडत असतात", अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation)

'मनसे हा परिवार, सहज तुटणार नाही', 320 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर राजू पाटालांचं मोठं विधान
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 25, 2021 | 6:33 PM
Share

कल्याण (ठाणे) : “मनसे हा परिवार आहे. तो सहज तुटणार नाही. नाराजीतून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या घटना घडत असतात. अशा प्रकारच्या घटना प्रत्येकल पक्षात घडतात. आम्ही या घटनेची दखल घेतली आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. पत्रीपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राजू पाटील आले होते. यावेळी प्रसारमाध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation).

कल्याणमध्ये मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रकरणावर राजू पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

“आम्ही काही नियुक्त्या केल्या होत्या. त्याबाबत पक्षात नाराजी होती. पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिलेले नाहीत तर पदाचे राजीनामे दिले आहेत. राज ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. त्यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ दिलेली आहे. नक्कीच त्यावर तोडगा निघेल”, असं राजू पाटील यांनी सांगितलं (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation).

‘नियोजन न करता पूल पाडल्याने विलंब’

“पत्रीपुलाचं उद्घाटन झालं, याचा आनंद होतोय. पत्रीपुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त शोधत कुणी बसलं नाही, याचाही आनंद झाला. कारण लोकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. रस्ते बाधितांनाही न्याय मिळेल”, असं आश्वासन पाटील यांनी दिलं. “कोणतंही नियोजन न करता पूल तोडले गेले. त्याच्यामुळे बांधकामाला विलंब लागला. आधी सर्व तयारी करायला हवी होती”, असंदेखील राजू पाटील यावेळी म्हणाले.

‘सरकारला दखल घ्यावी लागेल’

राजू पाटील यांनी यावेळी शेतकरी आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. कोरोनाच्या नावाखाली आंदोलने दडपली जात आहे. मात्र, ही आंदोलन उग्र झाल्यास सरकारला शेवटी याची दखल घ्यावीच लागेल”, असं मत त्यांनी मांडलं.

नितीन गडकरींची भेट का घेतली?

“2005 ते 2010 या काळात माजी आमदार हरिशचंद्र पाटील यांनी डोंबिवली ते मुंब्रा हा रेल्वे समांतर रस्ता व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. तो प्रस्ताव एमएमआरडीएकडे गेला. हा प्रस्ताव एमएमआरसीकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी एका संस्थेला अहवाल काढण्याचं काम दिलं होतं. त्या संस्थेने 92 ते 93 कोटींचं बजेट तयार केलं होतं. मात्र, त्यानंतर तो प्रस्ताव पुढे सरकला नव्हता. सध्याच्यी आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकार हा रस्ता तयार करेल असं वाटत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली”, असं राजू पाटील यांनी सांगितलं

संबंधित बातमी : कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं

Follow Us
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला….

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला…

IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास.

IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान.

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान