AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत चिंताजनक! बालविवाहामुळे कुपोषणाचे बळी वाढले? 3 वर्षात तब्बल 15,253 बालविवाह तर कुपोषणामुळे 6,582 बळी

महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे साडे सहा हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

अत्यंत चिंताजनक! बालविवाहामुळे कुपोषणाचे बळी वाढले? 3 वर्षात तब्बल 15,253 बालविवाह तर कुपोषणामुळे 6,582 बळी
धक्कादायक आकडेवारीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 26, 2022 | 2:22 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे (Malnutrition) होणाऱ्या बालमृत्यूचं (Child deaths) प्रमाण तर चिंताजनक आहेत. पण आता समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीतून बालविवाहाचं प्रमाणही लक्षणीय असल्याची नोंद करण्या आली आहे. बालविवाहाचं प्रमाण हे कुपोषणामुळे होणाऱ्या बळींच्या संख्येपेक्षा तब्बल दुप्पट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये ही आकडेवारी देण्यात आली. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक आहे. इतकंच काय तर कुपोषणामुळे होणारे मृत्यूही चिंताजनक असल्याची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात आदिवासीबुहल सोळ जिल्ह्यांमध्ये 15,253 बालविवाह झालेत. तर 6582 जणांचा बळी हा कुपोषणामुळे गेलाय. इंडिया टुडेच्या विद्या यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अहवालात जारी करण्यात आलेली आकडेवारी हायकोर्टातील एका सुनावणी दरम्यान सादर करण्यात आली होती.

आकडेवारी कुठून आली?

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु होती. वकील आशुतोष कुंबकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार वरील आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या अहवालात महाराष्ट्रातील बहुतांश आदिवासीबहुल सोळा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

सादर करण्यात आलेल्या अहवालातील ठळक नोंदी

  1. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा तीन वर्ष अभ्यास
  2. अभ्यासात 15 हजारपेक्षा जास्त बालविवाहांची नोंद
  3. कुपोषणामुळे 6,500 हून अधिक बळी गेल्याचं समोर

बालविवाहामुळे मृत्यूचं प्रमाण चिंताजनक!

महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे साडे सहा हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 601 प्रकरणांत बालविवाहाला बळी पडलेल्यांचा समावेश होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणामुळे बाराशेपेक्षा जास्त मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यातील 137 प्रकरणांमध्ये बाळाचा मृत्यू झालेली आई, ही अल्पवयीन असल्याची नोंद आहे. अमरावीतत 729 पैकी 75, गडचिरोलीत 804 पैकी 88 प्रकरणात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला बालविवाह कारणीभूत ठरल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.

ठळक नोंदी…

  1. कुपोषणामुळे 3 हजार मृत्यू झालेल्या बाळांची आई अल्पवयीन
  2. नंदुरबार, अमरावतीसह, नाशिक, ठाणे पालघर आणि गडचिरोलीत कुपोषणाच्या बळींची नोंद
  3. कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखाचे असतील, तर बालविवाह सगळ्यात आधी रोखले पाहिजेत
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.