AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांच्या ‘त्या’ कॉल चा राज ठाकरेंनी किस्सा सांगितला, मागे कुणीतरी बोलत होतं? नितेश राणेंनी नावच सांगून टाकलं….

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील जाहीर भाषणातील एका संदर्भाचा आधार घेऊन आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या 'त्या' कॉल चा राज ठाकरेंनी किस्सा सांगितला, मागे कुणीतरी बोलत होतं? नितेश राणेंनी नावच सांगून टाकलं....
Image Credit source: Google
| Updated on: Mar 23, 2023 | 4:59 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळावा मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामध्ये राज ठाकरे यांनी नारायण राणे हे शिवसेना सोडून गेलेच नसते असा दावा केला होता. हा दावा करत असताना राज ठाकरे यांनी त्यावेळेला घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यामध्ये एक कॉल आल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे बोलत असतांना त्यांनी मागे कुणीतरी बोलत होतं हे मला कळत होतं असं म्हंटलं होतं. नारायण राणे पक्षात थांबायला तयार होते असं म्हंटलं होतं. एकूणच राज ठाकरे यांनी हा प्रसंग सांगत असतांना नाव घेणं टाळलं होतं. पण रोख मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरच होता.

शिवतीर्थावर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी काही प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये नारायण राणे यांना पक्षात थांबू नये यासाठी तो अखेरचा कॉल असतांना मागे कोण पुटपुटत होतं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेतील अनेक नेत्यांची नावं घेतली जात होती. त्यावरून मात्र नितेश राणे यांनी थेट नाव घेऊनच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी काल जे सांगितले तो मागून बोलणारा माणूस म्हणजे उध्दव ठाकरे असल्याचे नितेश राणे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दबाव टाकत नारायण राणे यांना भेटण्यासाठी रोखले. तुम्ही नारायण राणे यांना भेटले तर मुलबाळ सोबत मातोश्री सोडेल असं उद्धव ठाकरे म्हणल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

सगळे लोक उद्धव ठाकरे मुळे बाहेर पडले आहे. उद्धव ठाकरे ज्या पध्दतीने सहानुभूती घेत आहेत ते खोटारडे आहेत. महाराष्ट्र ला कळू द्या की का माणूस कसा आहे. अशी टीका नितेश राणे यांनी करत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात प्रवेश करतांना एकत्र आले त्यावर ठाकरे आणि फडणवीस सोबत सभागृहात आल्याने काय होत काही नाही असेही मत नितेश राणे यांनी मांडत असतांना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी आणि पेंग्विन गाडीतून उतरलो तर तो त्याच्या बाजूने चालणार मी माझ्या पद्धतीने चालणार. माझ्या बाजूने पेंग्विन गेला तर मी काय लाथ मारून ढकलनार का? असा सवाल उपस्थित करत नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.