AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

आदित्य ठाकरे यांनी इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधत अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा
| Updated on: Aug 12, 2020 | 3:53 PM
Share

मुंबई : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभु यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य करुन घेतली. थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

मुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत 12 ऑगस्ट 2020 रोजी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

आदित्य ठाकरे यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला. अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

हेही वाचा : पद्म पुरस्कार समिती, आदित्य ठाकरे अध्यक्ष, धनंजय मुंडे, सुनील केदार, सुभाष देसाईंसह 9 सदस्य

थकीत पाणी बिल असलेल्या व्यक्तीकडून थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दराने अतिरिक्त रक्कम आकारली जाते. मात्र आता ही दोन टक्के दराने रक्कम आकारली जाणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींची पगारकपात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

(Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.