माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

आदित्य ठाकरे यांनी इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधत अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 3:53 PM

मुंबई : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभु यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य करुन घेतली. थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

मुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत 12 ऑगस्ट 2020 रोजी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

आदित्य ठाकरे यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला. अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

हेही वाचा : पद्म पुरस्कार समिती, आदित्य ठाकरे अध्यक्ष, धनंजय मुंडे, सुनील केदार, सुभाष देसाईंसह 9 सदस्य

थकीत पाणी बिल असलेल्या व्यक्तीकडून थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दराने अतिरिक्त रक्कम आकारली जाते. मात्र आता ही दोन टक्के दराने रक्कम आकारली जाणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींची पगारकपात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

(Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.