AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार…श्रीकांत शिंदे यांचा टोला

शिवसेनेला 19% जे मतदान शिवसेनेला होत होते. त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला झाले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे, असा पलटवार केला.

आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार...श्रीकांत शिंदे यांचा टोला
shrikant shinde
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 23, 2024 | 3:34 PM
Share

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वरळी मतदार संघ चर्चेत आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात महायुतीकडून संदीप देशपांडे उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागेल, असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतदान मिळवले आहे. परंतु ही टेम्पररी गोष्ट आहे. मात्र येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला…

श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला. तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. ‘संविधान खतरे मे, संविधान बचाव’, अशा सगळ्या खोट्या सांगून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केले गेले. त्या गैरसमजामुळे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केले गेले. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे. ही पर्मनंट अरेंजमेंट नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

कल्याणमध्ये आचारी अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी म्हटले की, लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकतात. वारंवार दिशाभूल होत नसते. येत्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. राज्यात पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला .

वरळीत फक्त सहा हजारांचे मताधिक्य

वरळी मतदारसंघात 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असे त्यांना वाटत होते. मात्र लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य दिले. त्यांना वाटत होते मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे. मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाजून आहे. मराठी व्यक्ती बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला आहे. हे त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले.

शिवसेना उबाठाकडूनच पैसे वाटप

शिवसेनेला 19% जे मतदान शिवसेनेला होत होते. त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला झाले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे, असा पलटवार केला.

Follow Us
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?