AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडावरच ‘अघोरी’ कृत्य; नवस फेडण्यासाठी भरत गोगावले यांनी बांधली पूजा? संभाजी ब्रिगेडच्या आरोपामुळे एकच खळबळ

Aghori Puja at Raigad Fort : रायगडावर अघोरी पूजा बांधल्याच्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संभाजी ब्रिगेडने मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेल्या आरोपाने पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रालाच बुवाबाजीच्या कठड्यात उभे केले आहे.

रायगडावरच 'अघोरी' कृत्य; नवस फेडण्यासाठी भरत गोगावले यांनी बांधली पूजा? संभाजी ब्रिगेडच्या आरोपामुळे एकच खळबळ
खरंच केली अघोरी पूजा?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2025 | 11:26 AM
Share

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र करत स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी हिंदवीपातशाही निर्माण करत रायगड ही राजधानी केली. स्वराज्याच्या या राजधानीतच अघोरी पूजा बांधल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केली आहे. रायगडावर मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला.

सूरज चव्हाण यांचा आरोप काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दोन व्हिडिओ त्यांच्या ट्विटर, एक्स खात्यावरून शेअर केले आहेत. त्यात मंत्री गोगावले हे काही पूजा करताना दिसत आहेत. ही पूजा कशाची आहे, ती कशासाठी करण्यात आली याविषयीची माहिती समोर आलेली नाही. पण ही अघोरी पूजा असल्याचा दावा दादा गटाने केला आहे. अघोरी विद्येसाठी ही पूजा बांधण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. चव्हाण यांनी दोन व्हिडिओ ट्विट केले आहे. त्यातील एक व्हिडिओ बंधिस्त जागेतील, चार भिंतीतील तर दुसरा व्हिडिओ हा मोकळ्या जागेतील आहे.

संभाजी ब्रिगेडचा तो आरोप काय?

रायगडावर नवसाचा अघोरी कृत्य करण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. निवडून येण्यासाठी रायगडच्या भरत गोगावले यांनी नुसती अघोरी पूजाच घातली नव्हती तर त्यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ‘नवस’ सुद्धा बोलला आणि तो फेडला, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगे़डने केला आहे.

महाराष्ट्रात रायगडाचे पावित्र्य राखले जात नसेल त्या सरकार आणि मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने गोगावले यांच्यावर अघोरी पूजा बांधल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता गोगावले काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत