AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election: अजित पवारांनी फडणवीसांचे आव्हान स्वीकारले, कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही, वि. परिषद निकालानंतर कळेल, अजितदादांचा दावा

फडणवीसांच्या सरकारच्या कार्यकाळात भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना एकाअर्थी राजकीय विजनवास सुरु झाला होता. जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन हे फडणवीसांचे सर्वाधिक जवळचे नेते झाले होते. अशा स्थितीत खडसेंना पाडण्य़ासाठी आता फडणवीस आणि अजित पवार हे राजकीय मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याची चर्चा आहे.

MLC Election: अजित पवारांनी फडणवीसांचे आव्हान स्वीकारले, कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही, वि. परिषद निकालानंतर कळेल, अजितदादांचा दावा
Devendra VS Ajit PawarImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 2:51 PM
Share

मुंबई – राज्यसभा निवडणुकांच्या निकालात शिवसेनेच्या उमे्दवाराचा पराभव झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राचे हिरो झालेले आहेत. आता राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीचाही(MLC election)निकाल लागेल, असा दावा आता भाजपाकडून करण्यात येतो आहे. भाजपाच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. राज्यसभेत आम्ही काठावर पास झालो, असे वक्तव्य अजित परवारांनी केले आहे. पराभवनानवंतर माणूस शिकतो, असेही ते म्हणाले आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

विधान परिषदेत अजितदादा विरुद्ध भाजपा संघर्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अपक्ष उमेदवारांना मॅनेज करण्याचे कामही शिवसेनेकडे होते. त्यात राष्ट्रवादी आणि विशेषता अजित पवार फार सक्रिय नव्हते असे सांगण्यात येत होते. शरद पवारांनी निकालांनंतर फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानंतर, तर अजित पवारांनीच पडद्याआड भाजपाला मदत केली का अशी चर्चाही रंगली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीत देहूच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न दिल्याने, अजित पवार आणि भाजपातील वितुष्ट वाढले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

खडसेंना पाडण्याचा भाजपाचा डाव

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी नुकत्याच केलेल्या एका गौप्यस्फोटानंतर भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेत पराभूत करण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना तिकिट दिले आहे. फडणवीसांच्या सरकारच्या कार्यकाळात भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना एकाअर्थी राजकीय विजनवास सुरु झाला होता. जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन हे फडणवीसांचे सर्वाधिक जवळचे नेते झाले होते. अशा स्थितीत खडसेंना पाडण्य़ासाठी आता फडणवीस आणि अजित पवार हे राजकीय मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणूकही चुरशीची होणार

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळआला, तर विधान परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळावा लागण्याची शक्यता आहे. १८ तारखेपासून भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतल्.या हॉटेलांत मुक्कामाला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच ही निवडणूकही प्रतिष्ठेची होईल, अशी शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.