AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काका-पुतणे एकत्र येणार? पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा घडी बसवणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे वाय बी चव्हाण सेंटर येथे आज महत्त्वाची भेट घडून आली आहे. त्यामुळे पक्षफुटीनंतर पवार कुटुंबीय डॅमेज कंट्रोलसाठी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे.

काका-पुतणे एकत्र येणार? पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा घडी बसवणार?
| Updated on: Jul 11, 2023 | 8:44 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विचारांच्या विरोधात जावून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. असं असलं तरी आता पवार कुटुंबीय काका-पुतण्यांमधील वाद शमवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत.

अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. युगेंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी श्रीनिवास पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीगाठींमागे खरंच काहीतरी घडतंय का? पवार कुटुंबिय पुन्हा काका-पुतण्यांमधील मतभेद दूर करण्यात यशस्वी होतात का? ते पक्षात डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या अशा भेटींमुळे चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याआधीदेखील अशी घटना घडली आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबियांची मध्यस्थी महत्त्वाची ठरली

विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी पार पडला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मध्यस्थी केली होती. स्वत: शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात याबाबतचा उल्लेख केला आहे.

प्रतिभा पवार यांच्या मध्यस्थीने त्यावेळी पवार कुटुंबातील कुटुता दूर सारण्यात आली होती. आतादेखील गोष्टी जास्त चिघळण्याआधी प्रयत्न केले तर डॅमेज कंट्रोल होऊ शकतं. त्यासाठीच आता पवार कुटुंबिय सक्रीय झाले तर नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुरु केलीय. त्यामुळे व्यथित झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांना फोन केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण श्रीनिवास हे परदेशात होते. ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. त्यानंतर आजच्या भेटीगाठी घडून आल्या आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता पवार कुटुंबिय खरंच पक्ष फुटीवर मार्ग काढण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात नाहीय. रोहित पवार हे देखील अजित पवार यांच्यावर बोलताना सावध प्रतिक्रिया देत आहेत. याउलट ते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.