AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला

Bahujan Vikas Aaghadi: माझ्याकडे तीच माहिती. तावडेंची माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. राष्ट्रीय महासचिव आहे. राज्यांची काही सूत्रे आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना पकडून देण्यासाठीच भाजपमध्येच कारस्थान झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला...नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला
sanjay raut
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 21, 2024 | 12:00 PM
Share

नालासोपारात भाजप आणि बहुजन विकास आघाडीत निर्माण झालेला राडाचे पडसाद उमटू लागले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यावर आता शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

प्रत्येक मतदार संघात १५ ते २० कोटी रुपये

निवडणुकीत आचारसंहिता लागू होण्याआधी १५ ते २० कोटी रुपये प्रत्येक मतदारसंघात पोहोचले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, नाशिकला हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झाल्या आहे. राम रेपाळे नावाचा शिंदेचा माणूस आहे. तो रात्री ११ नंतर पैसे घेऊन येतो. पैशाचं वाटप करून तो परत पोलीस बंदोबस्तात जातो. राम रेपाळे हे नाव लक्षात ठेवा. २३ तारखे नंतर त्याचं काय करायचं ते आम्ही पाहू. अशा १८ लोकांची नावे माझ्याकडे आहेत. पण विनोद तावडे स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. आमच्या बॅगा तपासतात. खिसे तपासतात. त्यांचं काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

तावडेंकडे १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं ऐकलं. त्यातील ५ कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत असं मी ऐकलं. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सत्ताधारी पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे, असे राऊत यांनी म्हटले.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?