AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेत राम कदम अन् भास्कर जाधव यांच्यात ‘तू तू मैं मैं’

उबाठा शिवसेनेकडे अनेक वर्षे मुंबई पालिका होती. डांबराचे रस्ते करायचे कारण यात त्यांना पैसे खायचे होते. पण आता या सरकारने सिमेंटचे रस्ते बनवले. वाझे सारखे प्यादे जवळ ठेवायचे आणि जनतेला त्रास द्यायचा, असे त्यांची भूमिका आहे. मुंबईला पाणी न मिळायला जबाबदार उबाठा असेल, असे राम कदम म्हणाले.

विधानसभेत राम कदम अन् भास्कर जाधव यांच्यात 'तू तू मैं मैं'
Ram KadamImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 05, 2025 | 4:24 PM
Share

Maharashtra Budget Session 2025: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे प्रकरणावरुन सत्ताधारी अडचणीत आले. सभागृहात विरोधक कमी असले तरी आक्रमक होत आहे. विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु झाली. त्या भाषणास पाठिंबा देत आमदार राम कदम यांनी मुंबईचे मुद्दे मांडले. त्यावेळी भाजप आमदार राम कदम आणि शिवसेना उबाठा नेते भास्कर जाधव यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाली. सभागृहात उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. उद्धव ठाकरे सभागृहात नसताना नाव का घेतले? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी राम कदम यांनी मी माजी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले असे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले अन् गोंधळ

राम कदम म्हणाले, मुंबईत कोरोना काळात अकरा हजार मुडदे पडले. त्याला कारण शिवसेना उबाठा होते. तेव्हाच सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव ठाकरे यांनी का बंद केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री सहायता निधी त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरु केला. कोरोना काळात मुंबईत कोव्हीड येण्यापूर्वी एकही व्हेंटीलेटर नव्हते. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली की, आपण व्हेंटीलेटरची व्यवस्था करा. त्या वेळच्या सरकारने ही व्यवस्था केली असती तर मुंबईत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला नसता. उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यावर बोलावे ही शिवसेना उबाठाची गरज आहे. त्यांना दाखवावे लागते, असा टोला राम कदम यांनी भास्कर जाधव यांना लगावला.

उबाठा शिवसेनेकडे अनेक वर्षे मुंबई पालिका होती. डांबराचे रस्ते करायचे कारण यात त्यांना पैसे खायचे होते. पण आता या सरकारने सिमेंटचे रस्ते बनवले. वाझे सारखे प्यादे जवळ ठेवायचे आणि जनतेला त्रास द्यायचा, असे त्यांची भूमिका आहे. मुंबईला पाणी न मिळायला जबाबदार उबाठा असेल, असे राम कदम म्हणाले.

शिवसेना राष्ट्रवादीवर मोठा आरोप

कोस्टल रोड ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती. कोस्टल रोडच्या बाजूची मोकळी जागा उद्धव ठाकरे यांना कोणाला द्यायची आहे होती, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला. राम कदम यांनी शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर मोठा आरोप केला. ते म्हणाले, काल सभागृहात शिवसेना नेते एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी महाराज यांचा मुद्दा मांडला. त्यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, जयंत पाटील गोंधळ घालत होते, असा आरोप राम कदम यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.