AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख

साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल, असेही अस्लम शेख (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)  म्हणाले.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख
| Updated on: Jul 14, 2020 | 4:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अनलॉक आणि मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार राज्यात काही शिथीलता देण्यात आली आहे. मुंबई लाईफलाईन मानली जाणारी लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

“मुंबईतील लोकल व्यवस्था ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार केंद्र सरकार याबाबत विचार करेल. हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही,” असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“मुंबईतील डबेवाल्यांचे मुंबईकरांशी गेल्या अनेक वर्षापासून नातं जुळलेलं आहे. सध्याच्या संकटात या डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल,” असेही अस्लम शेख म्हणाले.

“जुलै महिना अखेरपर्यंत ताळेबंद चालू राहणार असल्याने बकरी ईद देखील याच कालावधीमध्ये आहे. गणपती सण असा थोडा कमी प्रमाणात साजरा केला जातो. तसेच स्वरूपाची भूमिका बकरी ईद बाबत देखील असावी. याबाबत राज्य सरकारबरोबर आज चर्चा केल्या जाणार असून मुख्यमंत्री याबाबत भूमिका स्पष्ट करतील, “असेही अस्लम शेख यांनी सांगितलं. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

मुंबईची लाईफलाईन हळहळू पूर्वपदावर

‘लॉकडाऊन’मध्ये थांबलेली मुंबई अनलॉक करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. सोमवारी 15 जूनपासून मुंबईची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवाशाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

सद्यस्थितीत मुंबईत 350 लोकल धावत आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचारी प्रवास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोरोना नियंत्रित, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : महापौर किशोरी पेडणेकर

Navi Mumbai Transfer | मिसाळ यांच्या बदलीची स्थगिती मागे, बांगर नवी मुंबई पालिका आयुक्त

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.