AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्यांनी आता खाली बघून चालावं”; शिवसेनेच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या आमदारांना तंबीच दिली

आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे.

त्यांनी आता खाली बघून चालावं; शिवसेनेच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या आमदारांना तंबीच दिली
| Updated on: Feb 26, 2023 | 11:41 PM
Share

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दोन आठवड्यापर्यंत असल्यामुळे आम्ही काही ठाकरे गटाच्या आमदारांना कारवाईचा व्हीप बजावणार नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर राहण्याचा व्हीप आम्ही त्यांना बजावणार असल्याचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. हा व्हीप कारवाईचा नाही तर नियमाप्रमाणे असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर ऐकले नाही तर ठाकरे गटाच्या आमदारांवर रितसर कारवाई करणार असल्याचा इशारा भरत गोगावले यांनी लगावला आहे.

आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही पक्ष सोडलाच नाही, त्यामुळे आता ठाकरे गटाने ठरवावे.

त्यांच्यावर कारवाई होणार ही शंभर टक्के होणार, त्यांनी आता खाली बघून चालावं नाही तर ठेच लागते असा इशाार भरत गोगावले यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.

आज आदित्य ठाकरे यांनी 32 वर्षाच्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना घाम फोडला असं बोललं जात असले तरी अजून पर्यंत एकनाथ शिंदे यांना ठक्कर देणारा अजून कोणी आला नाही असंही भरत गोगावले यानी सांगितले आहे.

भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आता काँग्रेसच्या सोनिया गांधी आता राजकारणापासून संन्यास घेणार आहेत,

त्यामुळे संजय राऊत यांनीही ठाकरे गटापासून संन्यास घेतला गेला तर बरं होईल कारण त्यांच्यामुळे ठाकरे गटाला थोडी स्थिरता मिळेल असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.