AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान

महायुती सरकारमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा होत आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (प्रातिनिधिक फोटो)
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 07, 2024 | 8:37 PM
Share

देशातच नाहीतर जगभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे वाजत-गाजत स्वागत झाले. राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच आपल्या घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. आगमन झाल्यावर बाप्पाला भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं साकडं घातलं. आधीच निवडणुकीनंतर महायुतीमध्ये  मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कोणी घातलं जाणून घ्या.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगलमय वातावरण आहे. वर्षेभर या दिवसाची वाट पाहतो, गणरायाचे आगमन झाले आहेत. गणराय येतानाचे जे दिवस असतात ते भारावलेले असतात. सर्व नातेवाईक एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेला सुखी-समाधानी ठेव, काही ठिकाणी दुष्काळ पडला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. बळीराजा संकटात आहे, महायुती सरकारच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचण्याचं काम झालं आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाचा विकास साधायचा काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

एक व्हिजन असणारे नेते देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. युवक, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असा कोणता घटक नाही, जातीपातीच्या पलीकडे जात काम करणारा आमचा नेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्याच्या अधिकाधिक जागा निवडून येऊ द्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करताना बघण्याची संधी गणरायाने आम्हाला द्यावी. ही इच्छा फक्त माझीच नाहीतर समस्त महाराष्ट्रातील भाजप परिवाराची आहे. हीच इच्छा मी गणरायाकडे मागितली असल्याचं चित्र वाघ म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ