AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवार यांच्या तोंडी सत्य आणू शकलो याचा आपल्याला आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 29, 2023 | 6:23 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर डबलगेम केल्याचा आरोप केला होता. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पण नंतर त्यांनी माघार घेतली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी आमच्या भेटीगाठी झाल्या. आम्ही गुगली टाकली आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“मला खूप आनंद आहे की, कमीतकमी नेमकं खरं काय होतं ते मी शरद पवार यांच्या तोंडावर मी आणू शकलो. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे. उरलेलं सत्य देखील मी फार लवकर घेऊन येईन. मी सुद्धा गुगली फेकणार आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने हे सत्य तर बाहेर आणलंच. आता उरलेलं सत्यदेखील बाहेर येईलच. मी हळूहळू त्यांच्याकडूनच ते सत्य बोलून दाखवेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय”, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

“त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.

“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

“देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.