AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

"कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

BREAKING | अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
| Updated on: Jul 24, 2023 | 8:24 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना सध्या प्रचंड उधाण आलं आहे. दिवसभरात आज याचे पडसाद उमटलेले बघायला मिळाले. राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांनी तर खूप मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याचं पाटील म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. या सर्व चर्चांवर आता अखेर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

“कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘अजित पवार यांना आधीच स्पष्टपणे कल्पना दिलेली…’

“या संदर्भात अजित पवार आणि मी, आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची पूर्ण चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार’

“जे लोकं अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की, अशा प्रकारचे संकेत देणं किंवा संभ्रम निर्माण करणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण महायुती संदर्भात संभ्रम तयार होतो. नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये”, असं फडणवीसांनी आवाहन केलं.

‘आता झालाच तर आमचा विस्तार होईल’

“काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, अशाप्रकारची पंतगबाजी सध्या अनेक लोकं करत आहेत. अनेक लोकं राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण त्यांनी किती भविष्य सांगून आमच्या युतीत किंवा राज्याच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी दहा, अकरा तारखेला काही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे. त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा विस्तार होईल”, असं फडणवीसांनी सांगितलं.

कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.