AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम भोगावे लागतील’

देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. | Devendra Fadnavis Shivsena

'फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम  भोगावे लागतील'
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Apr 01, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि तत्सम उपाययोजनांना विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे (BJP) नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. (Shivsena slams BJP leader Devendra Fadnavis over politicizing Coronavirus situation in Maharashtra)

जनतेला लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी बेदरकारपणे जगणे सोडले पाहिजे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, सिनेमा, पर्यटनाचा आनंद सगळ्यांनाच हवा आहे. पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. त्यामुळे लोकांनी आधी जीव वाचवावा, असा सल्ला शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे.

‘देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे’

आम्हाला काय कोणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्श करणार नाही, या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेमधून कोरोना वाढत गेला. कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकिरी मंडळींना दुश्मन वाटू लागतात. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.

राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

सरकारला टाळेबंदी करुन लोकांना घरी बसवण्याचा छंद नाही

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, असे सरसकट सगळ्यांचे मत आहे. लॉकडाऊन नकोच असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सांगत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत असल्याने सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा पर्याय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला आहे. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्य आहे.

मात्र, कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबईत दररोजन पाच-सहा हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाट नाहीत. हे चित्र राज्याला परवडणारे आहे का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या:

RTPCR Test : ‘मोठी बातमी, महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

Maharashtra Corona : महाराष्ट्र सरकारचा ‘या’ 3T वर भर, यानंतर वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या थांबणार?

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले

(Shivsena slams BJP leader Devendra Fadnavis over politicizing Coronavirus situation in Maharashtra)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.