AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे हे आता अधिकृतपणे शिवसेनेचे कर्तेधर्ते आहेत. असं असताना त्यांच्याच मित्रपक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेनेचा उल्लेख करत मोठं विधान केलं.

'शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही', नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 08, 2023 | 5:52 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुढे वाटचाल करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केलेली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आहेत. असं असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

खरंतर नारायण राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली. पण टीका करताना त्यांनी ठाकरे गट असा उल्लेख न करता थेट शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा करत असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभा विराट नव्हती. त्या सभेत स्थानिक लोकं नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांना काय बोलता येतं? राज्याचा विकास, जनता, जनतेच्या प्रश्नाबद्दल काय बोलता येतं? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. काय दिलं कोकणाला? त्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

‘शिवसेना आता संपली’

“शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 आमदारही त्यांच्या हातात राहणार नाही. पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, 20 पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

“शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानफडातही मारलेली नाही. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फिरले काय? ते लोकांमध्ये असे व्यक्ती नाही. लोकांमध्ये जावून प्रभावित होईल असे ते नाही. त्यामुळे ही आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली आहे. भास्कर जाधव कोण आहे? शिव्या दिल्या किंवा नाचून दाखवलं म्हणजे झालं का? तसं महाराष्ट्राच्या लोकांना अभिप्रेत नाही. अरे उद्धव कुणाचीही जीभ हासडतो, स्वत:ची जीभ सांभाळ. अशी पाळी आली. असा फिरत राहिलास तर ती पण जागेवर राहणार नाही”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.