AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे हे आता अधिकृतपणे शिवसेनेचे कर्तेधर्ते आहेत. असं असताना त्यांच्याच मित्रपक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेनेचा उल्लेख करत मोठं विधान केलं.

'शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही', नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 08, 2023 | 5:52 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुढे वाटचाल करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केलेली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आहेत. असं असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

खरंतर नारायण राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली. पण टीका करताना त्यांनी ठाकरे गट असा उल्लेख न करता थेट शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा करत असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभा विराट नव्हती. त्या सभेत स्थानिक लोकं नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांना काय बोलता येतं? राज्याचा विकास, जनता, जनतेच्या प्रश्नाबद्दल काय बोलता येतं? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. काय दिलं कोकणाला? त्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

‘शिवसेना आता संपली’

“शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 आमदारही त्यांच्या हातात राहणार नाही. पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, 20 पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

“शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानफडातही मारलेली नाही. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फिरले काय? ते लोकांमध्ये असे व्यक्ती नाही. लोकांमध्ये जावून प्रभावित होईल असे ते नाही. त्यामुळे ही आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली आहे. भास्कर जाधव कोण आहे? शिव्या दिल्या किंवा नाचून दाखवलं म्हणजे झालं का? तसं महाराष्ट्राच्या लोकांना अभिप्रेत नाही. अरे उद्धव कुणाचीही जीभ हासडतो, स्वत:ची जीभ सांभाळ. अशी पाळी आली. असा फिरत राहिलास तर ती पण जागेवर राहणार नाही”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

Follow Us
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?