AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे हे आता अधिकृतपणे शिवसेनेचे कर्तेधर्ते आहेत. असं असताना त्यांच्याच मित्रपक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेनेचा उल्लेख करत मोठं विधान केलं.

'शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही', नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 08, 2023 | 5:52 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुढे वाटचाल करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केलेली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आहेत. असं असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

खरंतर नारायण राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली. पण टीका करताना त्यांनी ठाकरे गट असा उल्लेख न करता थेट शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा करत असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभा विराट नव्हती. त्या सभेत स्थानिक लोकं नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांना काय बोलता येतं? राज्याचा विकास, जनता, जनतेच्या प्रश्नाबद्दल काय बोलता येतं? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. काय दिलं कोकणाला? त्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

‘शिवसेना आता संपली’

“शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 आमदारही त्यांच्या हातात राहणार नाही. पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, 20 पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

“शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानफडातही मारलेली नाही. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फिरले काय? ते लोकांमध्ये असे व्यक्ती नाही. लोकांमध्ये जावून प्रभावित होईल असे ते नाही. त्यामुळे ही आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली आहे. भास्कर जाधव कोण आहे? शिव्या दिल्या किंवा नाचून दाखवलं म्हणजे झालं का? तसं महाराष्ट्राच्या लोकांना अभिप्रेत नाही. अरे उद्धव कुणाचीही जीभ हासडतो, स्वत:ची जीभ सांभाळ. अशी पाळी आली. असा फिरत राहिलास तर ती पण जागेवर राहणार नाही”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.