AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप नेत्याचे धक्कादायक विधान, संजय राऊत यांचे दोन शब्दांत उत्तर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतरही भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नाही. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी धक्कादाय ट्विट केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप नेत्याचे धक्कादायक विधान, संजय राऊत यांचे दोन शब्दांत उत्तर
देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: ANI
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 28, 2024 | 12:27 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतरही भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नाही. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी धक्कादाय ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस आहेत. मी आत्ताच सांगून ठेवतो, जर उलट सुलट राजकारण झाले तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील. मी त्यातला एक असणार आहे. अवधून वाघ यांच्या या ट्विटमुळे आता खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अवधूत वाघ

अवधूत वाघ यांनी म्हटले की, २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला. जनसामान्यांची भावना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, ही होती. एक कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात भावना लोकांपर्यंत पोहोचवली. विधानसभा निवडणूक निकालाचे सर्व श्रेय फडणवीस यांना द्यावे लागेल. निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळाले.

अवधूत वाघ यांनी मनसेवर टीका केली. त्यांनी म्हटले, मनसेला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यांनी आता ईव्हीएमवर बोलावे. त्यांना याबाबतचा कुठलाही अधिकार नाही. राज्यामध्ये सरकार भाजपचे बनेल महायुतीचे बनेल आणि महाराष्ट्राचा विकास होईल. विधिमंडळाच्या नेता देवेंद्र फडणवीस यांना निवडला जाईल आणि मग नावाची घोषणा केली जाईल.

संजय राऊत एका वाक्यात म्हणाले…

दरम्यान, संजय राऊत यांना अवधूत वाघ यांच्या ट्विटसंदर्भात विचारले. तेव्हा ते म्हणाले, अवधूत वाघ कोण आहेत मला माहीत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत राऊत म्हणाले, शिंदे ज्युनियर असूनही फडणवीस यांना ३ वर्षे त्यांच्या हाताखाली काम केले. त्यांच्याच नेतृत्वात एवढ्या जागा मिळाल्या. यामुळे भाजपचे कार्यकर्ते मागणी करत असतील त्यांना मुख्यमंत्री करा. मात्र त्यांच्या पक्षात निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीला आहे. महायुतीला पूर्ण बहुमत असताना मुख्यमंत्रीपद लटकून ठेवलेला आहे. हा जनतेचा कौल नाही. त्यांच्याऐवजी महाविकास आघाडीला अशी सत्ता मिळाली असती तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली असती, असे राऊत यांनी म्हटले.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.