AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पक्ष संपला तरी चालेल पण ‘मविआ’मध्येच ठाकरे राहतील”; भाजपने ठाकरे गटाची मजबूरी सांगितली…

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. महाविकास आघाडीत वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे मत त्यांच्या पक्षातील कोणताही नेता ऐकत नाही असा टोला लगावत त्यांच्या पक्षात कुणी मनाने एक नाहीत.

पक्ष संपला तरी चालेल पण 'मविआ'मध्येच ठाकरे राहतील; भाजपने ठाकरे गटाची मजबूरी सांगितली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 23, 2023 | 7:32 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून आता जागावाटपांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युती, इतर पक्षांची आघाडी-बिघाडीचा प्रश्न चर्चेला जात जात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून चाललेल्या चर्चेतील बिघाडीचा सूर त्यांनी दाखवून दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत ज्या वेळी जागावाटपाचा प्रश्न सुरु होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना दोन जागा दिल्या तरी ते मविआमध्येच राहतील कारण त्यांना पक्ष संपला तरी चालेल पण मविआसोबतच ते राजकीय प्रवास करतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत एवढी तडजोड करणार आहेत की, फक्त किंचित सेनादेखील राहणार नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तर दुसरीकड चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाजपविषयी बोलताना सांगितले की, आमच्यामध्ये जागा वाटपावरून नाराजी दिसणार नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र त्यांची सेना किंचित राहणार असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

राज्यात ज्या ज्या भागात दंगल झाली त्यावरून विरोधकांनी भाजपला कारणीभूत ठरवले आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, भाजपला दंगली वरुन राजकारण करण्याची अजिबात गरज वाटत नाही.

धार्मिक आधारावर मत मागणे आणि सत्तेत येणे ही आमची विचार धारा नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.

ज्या काँग्रेसकडून ही टीका केली जाते त्याच काँग्रेसच्या रक्तात ही गोष्ट असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. मुस्लिम मागासवर्गीय समाजाला भडकवण्याचं काम काँग्रेसने 65 वर्षे करत राहिले आहे असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली जाते ही खरं तर वेदनादायक गोष्ट आहे. हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे आणि त्यावर तातडीने काँग्रेसने माफी मागितली पाहिजे असं सांगत जर व्हिडीओ डिलीट केला नाही तर आंदोलन होणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. महाविकास आघाडीत वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे मत त्यांच्या पक्षातील कोणताही नेता ऐकत नाही असा टोला लगावत त्यांच्या पक्षात कुणी मनाने एक नाहीत.

त्यामुळे केवळ भाजपाला रोखण्यासाठी ते एकत्र आले आहेत, विचाराने एकत्र आले नाहीत असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला आणि शरद पवार यांना लगावला आहे.

त्यांच्या या लढाईमध्ये नरेंद्र मोदींचेच वादळ मोठे आहे, त्यामुळे हे तिन्ही पक्षांचा एकत्र आले तरी 51 टक्क्यांची लढाई आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....