सर्वात मोठी बातमी ! मनोजजी, हे सहन केलं जाणार नाही… जरांगे यांना भाजपचा पहिल्यांदाच इशारा; बड्या मंत्र्याचा हल्लाबोल

भाजपने मनोज जरांगे-पाटील यांना पहिल्यांदाच थेट इशारा दिला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत जरांगेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या अपमानास्पद टीकेचा तीव्र निषेध केला. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असला तरी, त्यांची शिवराळ भाषा आणि अतर्क आंदोलन महाराष्ट्राला मान्य नाही. १३ पैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून, सणासुदीत लोकांना त्रास न देण्याचे आवाहनही भाजपने केले आहे.

सर्वात मोठी बातमी ! मनोजजी, हे सहन केलं जाणार नाही... जरांगे यांना भाजपचा पहिल्यांदाच इशारा; बड्या मंत्र्याचा हल्लाबोल
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 12:52 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी शब्दात बोललं जात आहे. त्यांचा अपमान केला जात आहे. मनोजजी, हे मान्य केलं जाणार नाही. हे सहन केलं जाणार नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा. पण आमच्या नेत्यांवर अपमानस्पद बोललं तर आता खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. भाजपने पहिल्यांदाच उघडपणे जरांगे यांनी इशारा दिल्याने जरांगे आणि भाजप यांच्यात येत्या काळात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दात हल्ला चढवला. तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकार तुमच्या प्रश्नावर सकारात्मक आहे. आम्ही समाजासोबत आहोत. पण अपमानास्पद भाषा मान्य केली जाणार नाही. हे प्रकरण अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद पद्धतीने चाललंय ते बंद करा. सणासुदीला जनतेला त्रास होईल अशी भूमिका घेऊ नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असं आशिष शेलार म्हणाले.

शिवराळ भाषेचा निषेध

मराठा समाजाचे प्रश्न गंभीर आणि योग्य आहेत. आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण तुमची ही भाषा चालणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही भाषा योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ही भाषा योग्य नाही. आम्ही तुमच्या शिवराळ भाषेचा निषेध करतो आणि या पुढे ही भाषा सहन करणार नाही हेही स्पष्ट करतो, असा इशाराच शेलार यांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंनी समाजाबाबत भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी निर्णय घेतले आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

14 पैकी 13 मागण्या पूर्ण

सरकारने मराठा समाजासाठी न्यायाची भूमिका घेतली. मराठा समाजाला अधिकार देण्याचं काम केलं. बोलघेवडेपणा करणाऱ्यांनी काही केलं नाही. मराठा समाज हे जाणतो आहे. जरांगेंना विनंती आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून असतील तर त्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सणांच्यावेळी आंदोलन आणि कूच करणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले.

अतर्क, अततायी आणि अपमानास्पद

जरांगे यांचं आंदोलन म्हणजे अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद शब्दांचं आहे. अतर्क यासाठी म्हणतो ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, ज्या न्यायिक प्रक्रियेत टिकल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे. तरीही आंदोलन करणं अतर्क आहे. अतातायीपणा यासाठी की, न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे. चर्चाही करत आहे. मंत्रिमंडळ गटाची स्थापना केली आहे. तरीही टोकाची भूमिका घेणं हा अततायीपणा आहे. आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, मनोज जी ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us