AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामांतर अधिसूचनेला स्थगिती नाही; हायकोर्टाची याचिकाकर्त्याला नव्याने आव्हान देण्यास मुभा

केंद्राच्या मान्यतेनंतर या निर्णयाची लगेच अंमलबजावणी होईल. त्यामुळे निर्णयाला स्थगिती द्यावी किंवा परिस्थिती स्थिती 'जैसे थे' ठेवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

नामांतर अधिसूचनेला स्थगिती नाही; हायकोर्टाची याचिकाकर्त्याला नव्याने आव्हान देण्यास मुभा
नामांतर अधिसूचनेला नव्याने आव्हान देण्याची मुभा
| Updated on: Feb 27, 2023 | 11:47 PM
Share

मुंबई : उस्मानाबादचं ‘धाराशिव’ आणि औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ असं नामकरण करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राच्या ना हरकतीनंतर काढलेल्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, या अधिसूचनेला जुन्या याचिकेत सुधारणा करून नव्यानं आव्हान देण्याची याचिकाकर्त्यांना कोर्टाने मुभा दिली आहे. मागील सुनावणी दरम्यान याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकारनं वेळ मागितला होता. मात्र ते प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल करण्याआधीच या नामकरणाला केंद्र सरकारनं ना हरकत दिल्याची अधिसूचना काढली. त्यामुळे ही कृती सगळ्यांचं सरसकट भगवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील प्रज्ञा तळेकर यांनी कोर्टात केला.

याचिकाकर्त्यांचा दावा काय?

नामांतराची प्रक्रिया लोकशाही पद्धतीनं होत असते, असा दावा याचिकाकर्त्यांचे जेष्ठ वकील युसुफ मुछाला यांनी केला. केंद्राच्या मान्यतेनंतर या निर्णयाची लगेच अंमलबजावणी होईल. त्यामुळे निर्णयाला स्थगिती द्यावी किंवा परिस्थिती स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. सदर याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली.

निर्णय घेताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप

या नामांतराचा निर्णय घेताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोन जणांच्या मंत्रिमंडळानेच निर्णय घेतल्याचं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे इथं कायद्याचं उल्लंघन करून निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत, आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेलाही आव्हान देण्याची मुभा याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे मागितली होती.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.