AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू
जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडालेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 9:02 PM
Share

मुंबई : या पावसाळ्याच्या (Rain) दिवसात पाण्यात खेळण्याचा मोह काही केल्या मुलांना आवरत नाही. त्यामुळे आत्ताच्या दिवसात समुद्रकिनारची (Juhu Beach) गर्दी ही वाढलेली पाहायला मिळते. अनेक मुलं बीचवर खेळण्यासाठी येतात. कधी कधी ती समुद्राच्या पाण्यातही उतरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्या हेच महागात पडून शकतं. याचच एक उदाहरण आज मुंबईतल्या जुहू बीचवर पहयाला मिळालं आहे. कारण मुंबईतील जुहू बीचवर आज दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता (Boys Drown) झाली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

बीएमसीने काय माहिती दिली?

मुंबईतील जुहू बीचवर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एफआरटी पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. नौदलाकडूनही यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

नेमका प्रकार काय घडला?

मुंबईतल जुहू चौपाटीवर काही तासांपूर्वी अमन सिंह, वय 21 वर्षे, कौस्तुभ गणेश गुप्ता, वय 18 वर्षे, तसेच प्रथम गणेश गुप्ता, वय 16 वर्षे असे तिघेजण खेळण्यासाठी गेले होते. मात्र खेळता खेळता ते पाण्यात गेले. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसात समुद्रही जास्त खवळलेला आहे. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा आहेत. अशा लाटात सहज पोहणे शक्य होत नाही. अशा लाटा या किनाऱ्यावरील पाण्यातल्या मानला समुद्रात ओढून नेताता. तसाच काहीसा प्रकार याही मुलांसोबत घडला आहे. त्यामुळे हा घटनेने या परिसरातही खळबळ माजली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आणि इतर वेळीही समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डही तैनात असतात. मात्र काही जणांकडून नियम मोडून पाण्यात उतरण्यासारखे प्रकार घडतात. मात्र हेच प्रकार नंतर डोकेदुखी वाढवतात. त्यामुळे या दिवसात तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.