AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू
जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडालेImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 14, 2022 | 9:02 PM
Share

मुंबई : या पावसाळ्याच्या (Rain) दिवसात पाण्यात खेळण्याचा मोह काही केल्या मुलांना आवरत नाही. त्यामुळे आत्ताच्या दिवसात समुद्रकिनारची (Juhu Beach) गर्दी ही वाढलेली पाहायला मिळते. अनेक मुलं बीचवर खेळण्यासाठी येतात. कधी कधी ती समुद्राच्या पाण्यातही उतरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्या हेच महागात पडून शकतं. याचच एक उदाहरण आज मुंबईतल्या जुहू बीचवर पहयाला मिळालं आहे. कारण मुंबईतील जुहू बीचवर आज दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता (Boys Drown) झाली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

बीएमसीने काय माहिती दिली?

मुंबईतील जुहू बीचवर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एफआरटी पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. नौदलाकडूनही यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

नेमका प्रकार काय घडला?

मुंबईतल जुहू चौपाटीवर काही तासांपूर्वी अमन सिंह, वय 21 वर्षे, कौस्तुभ गणेश गुप्ता, वय 18 वर्षे, तसेच प्रथम गणेश गुप्ता, वय 16 वर्षे असे तिघेजण खेळण्यासाठी गेले होते. मात्र खेळता खेळता ते पाण्यात गेले. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसात समुद्रही जास्त खवळलेला आहे. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा आहेत. अशा लाटात सहज पोहणे शक्य होत नाही. अशा लाटा या किनाऱ्यावरील पाण्यातल्या मानला समुद्रात ओढून नेताता. तसाच काहीसा प्रकार याही मुलांसोबत घडला आहे. त्यामुळे हा घटनेने या परिसरातही खळबळ माजली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आणि इतर वेळीही समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डही तैनात असतात. मात्र काही जणांकडून नियम मोडून पाण्यात उतरण्यासारखे प्रकार घडतात. मात्र हेच प्रकार नंतर डोकेदुखी वाढवतात. त्यामुळे या दिवसात तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.