AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आंदोलकांवर 307 कलम लावणं, चुकीचच” राष्ट्रवादीच्या नेत्यानं ‘या’ कलमांची यादीच वाचून दाखवली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर मनोज गरबडे यांची सुटका होण्यासाठी राज्यातील विविध वकिलांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.

आंदोलकांवर 307 कलम लावणं, चुकीचच राष्ट्रवादीच्या नेत्यानं 'या' कलमांची यादीच वाचून दाखवली
| Updated on: Dec 14, 2022 | 8:20 PM
Share

मुंबईः गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अपमान केला. म्हणून त्या घटनेच्या निषेधार्थ शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम 307 कलम लावून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावर नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर गृहमंत्र्यालयावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्या घटनेनंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद केल्याने जोरदार टीका केली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर मनोज गरबडे यांची सुटका होण्यासाठी राज्यातील विविध वकिलांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर आज मनोज गरबडे यांनी केलेल्या शाईफेक प्रकरणावर आणि आंदोलकांवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारने असे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्याआधी माझ्यावरही 354 कलम लावून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर पुण्यातील आंदोलकांवर 307 कलम लावून खोटा नोंद करणे म्हणजे सरकारचा हा अतिरेकीपणा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकार मायबाप सरकार असते. त्यामुळे आंदोलकांवर असे खोटे गुन्हे नोंद करून आंदोलकांवर वेगवेगळी कलमं लावणं चुकीचे आहे. सरकारविरोधात आंदोलन होणारच आहे. त्यामुळे राग हा सरकारला येताच कामा नये. सरकार मायाळू, दयाळू आणि प्रेमळ पाहिजे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर सरकारने जो अतिरेकीपणा दाखवला आहे तो असताच कामा नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.