AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आंदोलकांवर 307 कलम लावणं, चुकीचच” राष्ट्रवादीच्या नेत्यानं ‘या’ कलमांची यादीच वाचून दाखवली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर मनोज गरबडे यांची सुटका होण्यासाठी राज्यातील विविध वकिलांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.

आंदोलकांवर 307 कलम लावणं, चुकीचच राष्ट्रवादीच्या नेत्यानं 'या' कलमांची यादीच वाचून दाखवली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 14, 2022 | 8:20 PM
Share

मुंबईः गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अपमान केला. म्हणून त्या घटनेच्या निषेधार्थ शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम 307 कलम लावून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावर नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर गृहमंत्र्यालयावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्या घटनेनंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद केल्याने जोरदार टीका केली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर मनोज गरबडे यांची सुटका होण्यासाठी राज्यातील विविध वकिलांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर आज मनोज गरबडे यांनी केलेल्या शाईफेक प्रकरणावर आणि आंदोलकांवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारने असे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्याआधी माझ्यावरही 354 कलम लावून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर पुण्यातील आंदोलकांवर 307 कलम लावून खोटा नोंद करणे म्हणजे सरकारचा हा अतिरेकीपणा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकार मायबाप सरकार असते. त्यामुळे आंदोलकांवर असे खोटे गुन्हे नोंद करून आंदोलकांवर वेगवेगळी कलमं लावणं चुकीचे आहे. सरकारविरोधात आंदोलन होणारच आहे. त्यामुळे राग हा सरकारला येताच कामा नये. सरकार मायाळू, दयाळू आणि प्रेमळ पाहिजे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर सरकारने जो अतिरेकीपणा दाखवला आहे तो असताच कामा नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....