AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”; विश्व मराठी साहित्य संमेलनात सीमावाद पुन्हा घुमला…

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा गौरव करत जगभरात तिचा होत असलेला विकास हा अभिमानस्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे; विश्व मराठी साहित्य संमेलनात सीमावाद पुन्हा घुमला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 3:27 PM
Share

मुंबईः भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तीव्र भावना होती. मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा आहे. आपल्या काही भाषिक बांधवांचा असा महाराष्ट्रात येण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरु आहे. त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये दिला आहे.

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या केल्या जाणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना सांगितले की, गेल्या कित्येक वर्षापासून सीमावादाचा प्रश्न पडून होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सीमावादाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच या विषयावर चर्चा केली. त्यामुळे हा वाद लवकरच निकालात निघणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच आमच्या सरकारव बरोबर चर्चा करून हा वाद सोडवण्याचा विश्वास दिला आहे. त्यामुळे भविष्यातही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी जे जे करता येईल त्या त्या सर्व गोष्टी कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी केल्या जाणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा गौरव करत जगभरात तिचा होत असलेला विकास हा अभिमानस्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई ही महाराष्ट्र मिळवताना 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. याची जाणीवही माझ्या मनात सातत्याने असते, त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान