AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगाव मुद्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला हा पुरावा, म्हणाले तो तर वादग्रस्त इलाका

Sanjay Raut On CM | बेळगाव मुद्यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव प्रश्नावर आंदोलनात सहभाग घेतल्याच्या मुद्यावर त्यांनी कोपरखळी मारली. ते बेळगावच्या तुरुंगात असतील तर त्यांनी पुरावा सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. काय म्हणाले खासदार राऊत...

बेळगाव मुद्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला हा पुरावा, म्हणाले तो तर वादग्रस्त इलाका
| Updated on: Jan 18, 2024 | 11:22 AM
Share

मुंबई | 18 जानेवारी 2024 : राज्याच्या राजकारणात पुन्हा बेळगावी सूर आलापण्यात आला आहे. राज्याच्या स्थापनेपासूनच बेळगाव हा मराठी अस्मितेचा विषय राहिला आहे. बेळगाव भागातील मराठी भाषिकांवर कन्नडिंगाकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली. आता नेमका हाच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करत आहे की मी बेळगावच्या जेल मध्ये होतो बोलत होते .बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही .जर ते जेल मध्ये होते. लाठी काठी खाल्ली असेल, तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होते, अशी कोपरखळी राऊत यांनी मारली.

बेळगाव हा वादग्रस्त इलाका

बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे अशी ती स्थिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची आग्रही भूमिका अनेकदा घेतली. आता शिवसेनेत असलेले आणि नसलेल्या अनेकांना गनिमी कावा करत बेळगावमध्ये आंदोलन पेटते ठेवले. मराठी अस्मिता जागृत ठेवली. आता पक्ष फुटल्यानंतर बेळगाव प्रश्नावर एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे.

हा तर सेनेच्या बदनामीचा डाव

सत्ताधारी उद्धव ठाकरे गटावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या खिचडी घोटाळ्याची यादीच जाहीर करत आरोपांची राळ उडवली होती. राऊत यांनी हे आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. “मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात उत्तम काम केलं. या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतर कामगारांसाठी खिचडी वाटप झाले तरीही अनेक खोटे प्रकरण खोटे साक्षी पुरावे उभे करून हे प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे”, असे ते म्हणाले.

घोटाळ्यातील आरोपी भाजपमध्ये

138 लोकांना खिचडी वाटप काम देण्यात आलं. मात्र यात किती लोकांच्या चौकशी झाल्या किती लोकांवर ते गुन्हे झाले हे देखील समोर आणावे, असे आवाहन त्यांनी केले. किमान 38 अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचा वाटप केला नाही पण मुंबई महानगरपालिका करून कोट्यावधी रुपयाचे उकळले. पण हे सगळे त्यांचे मोरके हे शिंदे गटांमध्ये आहेत. बीजेपी मध्ये आहेत किंवा बीजेपी यांच्या संबंधित संस्था आणि एनजीओ आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.