AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही पण…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघडले हे रहस्य

११ महिन्यांपूर्वी राज्याचे मोठे ऑपरेशन केले. संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुढील शिक्षण घेईल. माणसाकडे जिद्द, चिकाटी पाहिजे. तो नक्कीच पुढे जातो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही पण..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघडले हे रहस्य
| Updated on: Jun 20, 2023 | 9:01 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी बारावीच्या पुढे शिकू शकलो नाही. पण, माझ्या मनामध्ये जिद्द होती. मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं. आर्थोपिडिक सर्जन केलं. पण, त्याच्यासाठी हॉस्पिटल सुरू करून देऊ शकलो नाही. त्याच्या शिक्षणात त्याच्या आईचा मोठा वाटा होता. मी पण शांत राहिलो नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. पुणे विद्यापीठातून एमएचं फस्ट ईअर केलं. लास्ट ईअर करायला गेलो आणि ऑपरेशन २००० आलं. ११ महिन्यांपूर्वी राज्याचे मोठे ऑपरेशन केले. संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुढील शिक्षण घेईल. माणसाकडे जिद्द, चिकाटी पाहिजे. तो नक्कीच पुढे जातो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

स्वतःच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करू नका

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलं की, आपल्या प्रत्येकाकडे एक पत आहे. टॅलेंट आहे. आपल्याकडील क्षमतेकडे कुणीही दुर्लक्ष करू नये. स्वतःला कमी समजता कामा नये. आपण समाजात उत्तम काम करू शकतो. स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काही ना काही करतो. तेव्हा त्यांचा सन्मान होतो.

वारकरी संप्रदाय खरे समाजसुधारक

पाठीवर शाबाशकीची थाप दिली की, लोकं चांगले काम करतात. मार्गदर्शन हवे असते. समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे समाज सुधारतो. वारकरी संप्रदायाचे लोकं हे समाज सुधारण्यासाठी कीर्तन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जन्माने नव्हे कर्माने माणूस मोठा

आयुष्यामध्ये पांडुरंगाच्या नामस्मरणाचे वाटप करतात. चागंल्या आयुष्याकडे ते वळवत असतात. आनंद दिघे साहेब सांगायचे की, अर्धा-एक तास का होईना पांडुरंगाचे स्मरण केल्यास चांगले विचार येतात. जन्माने नाही तर माणूस कर्माने मोठा होत असतो. चांगले काम करून जावे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.

वारकरी नामस्मरण करतात. त्यातून समाजात शांतता निर्माण होते. समाजाची सुधारणा होते. पांडुरंगाचे स्मरण केल्याने चांगले विचार येतात, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.