AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणुका आल्या की, मुंबई तोडणार अशी ओरड”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उडवून लावलं

निवडणुका जवळ आल्या की, विरोधकांकडून कायम मुंबई तोडणार अशी ओरड सुरू होते. मात्र ही मुंबई मराठी माणसांची आहे, आणि ती महाराष्ट्राची आहे असंही थेटपणे विरोधकांना सांगण्यात आला आहे.

निवडणुका आल्या की, मुंबई तोडणार अशी ओरड; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उडवून लावलं
| Updated on: Feb 26, 2023 | 7:36 PM
Share

मुंबईः हिवाळी अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सध्या त्यांच्याकडे टीका करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका करताना ते चहापानाच्या खर्चावर घसरले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

निवडणुका जवळ आल्या की, विरोधकांकडून कायम मुंबई तोडणार अशी ओरड सुरू होते. मात्र ही मुंबई मराठी माणसांची आहे, आणि ती महाराष्ट्राची आहे असंही थेटपणे विरोधकांना सांगण्यात आला आहे.

गेल्या दोन अडिच वर्षे वर्षा बंद होते, मात्र आता वर्षावर लोकं येत असल्यामुळे त्यांना चहा तर द्यावा लागणारच असा टोला लगावत विरोधकांकडून आता चहापानाच्या खर्चावरही टीका केली जात आहे अशी टीका त्यांनी केली.

पुण्यातील कसाब पोटनिवडणुकीवरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूका आहे म्हणजे जावे तर लागणारच.

त्यातच आम्हाला लोकांचे प्रेम मिळत असल्यामुळेच अजित पवार यांची पोटदुखी होत आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर सातत्याने येत आहेत.

त्यावरून विरोधकांकडून टीका केली जाते. मात्र विरोधकांना केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी किती निधी उपलब्ध झाला. त्यातून नवनवीन योजना कोणत्या आल्या ते दिसत नाही अशा शब्दात विरोधकांवर त्यांनी पलटवार केला आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना जाब का विचारला जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर विरोधकांकडून राहुल गांधी यांना का जाब विचारला जात नाही असा सवाल त्यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.