AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress On Toll | मनसेनंतर काँग्रेसही मैदानात, टोलमधून मिळणाऱ्या रक्कमेबाबत मोठी मागणी

Congress On Toll | टोलचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मनसेने टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसनेही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला टोलच्या मुद्द्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Congress On Toll | मनसेनंतर काँग्रेसही मैदानात, टोलमधून मिळणाऱ्या रक्कमेबाबत मोठी मागणी
| Updated on: Oct 09, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई | टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमाफीच्या विधानानंतर आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी टोलनाक्यावर देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ वाहनचालकांना दाखवत त्यांची जनजागृती केलीय. तसेच त्यांना टोल न देता टोलनाक्यावरुन पाठवलंय. त्यानंतर आता काँग्रेसने यात उडी घेत मोठी मागणी केली आहे. टोलचा पैसा नक्की कुठे जातो, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

काँग्रेसचं म्हणणं काय?

“राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल वसुलीत झालेल्या भ्रष्टाचाराचीच कबुली दिली आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समजा चारचाकी वाहनांना राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल माफ झाला असेल, तर एवढी वर्षं राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहनचालक-मालक यांच्याकडून टोल घेतला जातो, तो नेमका कोणाच्या खिशात जातो?”, असा प्रश्न या निमित्ताने वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

“दर दिवशी टोलच्या माध्यमातून जमा होत असलेली शेकडो कोटींची रक्कम कुठे जाते? एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट का, राज्यातील लोकांना रस्त्यांवर, राज्य महामार्गांवर अगदी पायाभूत सुविधादेखील उपलब्ध का नसतात, या प्रश्नांची उत्तरंच फडणवीस यांनी आपल्या कबुलीतून दिली आहेत. हा पैसा नेमका कुठे जातो, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि केंद्रातील ED प्रिय भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या हिताच्या या प्रश्नावर संबंधितांवर कठोर कारवाई करावी” अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी टीकाही केली.

टोलबाबत काँग्रेसची भूमिका काय?

दरम्यान राज ठाकरे यांच्या आदेशनांतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल आणि वाशी टोल नाक्यावर वाहन विनाटोल सोडली. या दरम्यान पोलिसांशी बाचाबाचीही झाली. दरम्यान आता मनसैनिक वाशी, मुलंड टोलनाक्यानंतर आता दहिसर टोलनाक्यावर जाणार आहेत. दहीसर टोलनाक्यावर वाहनं ही टोल घेऊन की विना टोल सोडली जात आहेत, याची पाहणी मनसैनिक करणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवून ते तीनचाकी, दुचाकी आणि चारचाकी चालकांना टोल न भरण्याबाबत सांगणार आहेत.

Follow Us
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक