AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती?

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 16 टक्क्यांपेक्षा जास्त असून, ही चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याचं म्हणणं आहे.

Corona Update : देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती?
| Updated on: Mar 17, 2021 | 10:07 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न होत आहेत. पण कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरुच आहे. त्यात आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 16 टक्क्यांपेक्षा जास्त असून, ही चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं सरकारनं घालून दिलेले नियम पाळण्याचं आणि काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.(Compared to corona patients in the country, 60 per cent patients in Maharashtra alone)

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती ?

नांदेड नंदूरबार बीड धुळे नाशिक जळगाव भंडारा नागपूर चंद्रपूर अहमदनगर बुलडाणा औरंगाबाद अकोला

या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील आजची स्थिती काय?

महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर दिवसभरात 23 हजार 179 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 138 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दिवसभरात महाराष्ट्रात 84 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आढावा घेतला तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 70 हजार 507 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 21 लाख 63 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 हजार 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात कोरोनाचा स्फोट

पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 573 रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपूसन प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 1 हजारांपेक्षांही कमी आहे. आज पुण्यात दिवसभरात 2587 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त 769 जण कोरोनातून मुक्त झाले.

संबंधित बातम्या :

शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?

Nagpur Lockdown Update : नागपुरात कडक निर्बंध, भाजी-फळं-चिकन मटण दुकानाच्या वेळा बदलल्या!

Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

Compared to corona patients in the country, 60 per cent patients in Maharashtra alone

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.