AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona update – मुंबईकरांनो सावधान, आज राज्यात कोरोनाच्या नव्या 1357 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू, सर्वाधिक 889 रुग्ण मुंबईत

राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती असेल, तसेच कॉलेज, शाळा आणि हॉस्पिटलमध्येही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

Corona update - मुंबईकरांनो सावधान, आज राज्यात कोरोनाच्या नव्या 1357 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू, सर्वाधिक 889 रुग्ण मुंबईत
covid updateImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 6:13 PM
Share

मुंबई – कोरोनाची (Covid 19)रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 1357 नव्या रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 889 रुग्ण हे मुंबईतले आहेत. तर 104 रुग्ण हे नवी मुंबईत सापडले आहेत. ठाणे शहरात 91, तर ठाणे जिल्ह्यात 25 रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 68 आणि पुणे परिसरात 10 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, (Mumbai)नवी मुंबई, ठाणे आणि पुणे (Pune)या भागातच कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. मुंबईत आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा मृत्यूदर सध्या 1,87 टक्के इतका आहे.

पाच राज्यांना केंद्राचा इशारा

केंद्र सरकारने काल वाढत्या कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 5 राज्यांना पत्रे पाठवली आहेत, त्यात मुंबईचा समावेशही करण्यात आला आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. राज्य सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलत मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात पुन्हा मास्क सक्ती

राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती असेल, तसेच कॉलेज, शाळा आणि हॉस्पिटलमध्येही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.