AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत”, सरकारवर सडकून टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत, सरकारवर सडकून टीका
| Updated on: Dec 15, 2022 | 11:52 PM
Share

मुंबईः सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मुंबईत 17 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सरकारविरोधात हा महामोर्चा काढला जात असला तरी हा महामोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला भाणावर आणण्यासाठी, आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.

या महामोर्चावरून राष्ट्रवादीचे आमदा जितेंद्र आव्हाड आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

त्यासाठी महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात आहे.

तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सरकारवर टीका करताना शिंदे गटासारखं इव्हेट करुन माणसं आणावी लागत नाहीत तर ती उत्स्फूर्तपणे महामोर्चाला येणार आहेत असंही त्यांनी सांगितले. पुण्यापेक्षा महामोर्चा मुंबईत असणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

सध्या राज्यात अनेक समस्या आहेत. तरीही राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात नाहीत. रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा समस्या असतानाही लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाही ते विषय काढून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.