AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत”, सरकारवर सडकून टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत, सरकारवर सडकून टीका
| Updated on: Dec 15, 2022 | 11:52 PM
Share

मुंबईः सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मुंबईत 17 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सरकारविरोधात हा महामोर्चा काढला जात असला तरी हा महामोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला भाणावर आणण्यासाठी, आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.

या महामोर्चावरून राष्ट्रवादीचे आमदा जितेंद्र आव्हाड आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

त्यासाठी महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात आहे.

तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सरकारवर टीका करताना शिंदे गटासारखं इव्हेट करुन माणसं आणावी लागत नाहीत तर ती उत्स्फूर्तपणे महामोर्चाला येणार आहेत असंही त्यांनी सांगितले. पुण्यापेक्षा महामोर्चा मुंबईत असणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

सध्या राज्यात अनेक समस्या आहेत. तरीही राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात नाहीत. रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा समस्या असतानाही लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाही ते विषय काढून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...