AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत”, सरकारवर सडकून टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत, सरकारवर सडकून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 15, 2022 | 11:52 PM
Share

मुंबईः सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मुंबईत 17 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सरकारविरोधात हा महामोर्चा काढला जात असला तरी हा महामोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला भाणावर आणण्यासाठी, आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.

या महामोर्चावरून राष्ट्रवादीचे आमदा जितेंद्र आव्हाड आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

त्यासाठी महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात आहे.

तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सरकारवर टीका करताना शिंदे गटासारखं इव्हेट करुन माणसं आणावी लागत नाहीत तर ती उत्स्फूर्तपणे महामोर्चाला येणार आहेत असंही त्यांनी सांगितले. पुण्यापेक्षा महामोर्चा मुंबईत असणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

सध्या राज्यात अनेक समस्या आहेत. तरीही राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात नाहीत. रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा समस्या असतानाही लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाही ते विषय काढून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....