AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटींग? फडणवीसांच्या त्या उत्तरानं वाढवला सस्पेन्स

Vice Presidential election cross voting ? : आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होते. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री?

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटींग? फडणवीसांच्या त्या उत्तरानं वाढवला सस्पेन्स
क्रॉस वोटिंग होणार?
| Updated on: Sep 09, 2025 | 1:29 PM
Share

आज उपराष्ट्रपतींची निवडणूक होत आहे. मतदान सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल. त्यानंतर आजच उपराष्ट्रपती कोण याचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार निवडले आहे. तर भाजप आणि मित्र पक्षाने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा वाढला सस्पेन्स

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला आहे. आगे आगे देखो होता हैं क्या असे म्हणत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य केलं. खासदार फुटून क्रॉस वोटींग होणार का? या प्रश्नावर फडणवीसांनी असं मोठं विधान केलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी क्रॉस व्होटिंगचं स्वप्न पहात रहावं, असा टोलाही ही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्य सरकारने नमो महायोजना सुरु केली. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळतील. आपण तीन हफ्त्यामध्ये पैसे देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 वा हफ्ता दिला. आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हफ्ता देण्यात आला. आपण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केलेय. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. महासन्मान निधीचे पैसे आज आम्ही जमा केलेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हफ्ता वितरित झाला. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास ९१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे. १८९२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अंजली कृष्णाप्रकरणात रिपोर्ट मागवला

सोलापूरच्या महिला पोलीस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईची धमकी दिली होती. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजितदादांनी सुद्धा याविषयात स्पष्टीकरण दिल्याचे ते म्हणाले.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.