AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबई, केरळमध्ये परिणाम, आता मुंबईपासून 290 किमीवर

Cyclone Biparjoy in mumbai : राज्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. मुंबई, कोकणात समुद्राच्या अंतरंगात बदल झाला असून उंच लाटा निर्माण होणार आहे. माच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबई, केरळमध्ये परिणाम, आता मुंबईपासून 290 किमीवर
| Updated on: Jun 12, 2023 | 2:19 PM
Share

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाले आहे. त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती-ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत आहेत. बिपरजॉय मुंबईपासून 290 किमीवर आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह पावसाच्या हालचालीही सुरू आहेत. काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीवर जणार आहे.

दोन दिवस राज्यात पाऊस

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे जहाजे सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. मुंबई हवामान विभागाने चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत वादळाचा परिणाम दिसत आहे.

गुजरातमध्ये टीम तयार

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधून पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत चक्रवादळाचा धोका कायम असून त्यानंतर तो कराचीत पोहचणार आहे. वादळामुळे होणाऱ्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तयार ठेवली आहे. या चक्रीवादळामुळे १५ जून रोजी सौराष्ट्र अन् कच्छ भागांत 125-130 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वादळ आणखी तीव्र होणार

बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका गुजरातच्या किनारपट्टीवर बसणार आहे. पुढील काही तासांत हे वादळ तीव्र होणार आहे. या वादळामुळे वारे 125 किलोमीटर ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर हे वादळ पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत या वादळाचा अरबी समुद्रात मुक्कम आहे.

मुंबई, कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नसला तरी समुद्राच्या अंतरंगात बदल होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला असल्याचा पाहायला मिळत आहे. उंच लाटा देखील समुद्रातून बाहेर पडत आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झालेला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.