AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : देवेंद्र फडणवीस यांना अटक करायची होती का?; फडणवीस म्हणतात, “यांना सुपारी देण्यात आली होती”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटील यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही. मला अटक करण्याचा आदेश हा वळसे पाटील यांचा नव्हता. तो वरून आलेला आदेश होता.

Special Report : देवेंद्र फडणवीस यांना अटक करायची होती का?; फडणवीस म्हणतात, यांना सुपारी देण्यात आली होती
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Social Media
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jan 24, 2023 | 9:36 PM
Share

मुंबई : मला अटक करण्यासाठी डाव रचण्यात आला होता. माझ्या अटकेची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) संजय पांडे यांना दिली होती. असा सणसणाटी आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा डाव होता. असा खळबळजनक गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष म्हणजे याची माहिती आताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही होती, असंही फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते. अटकेचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं. असा दावा फडणवीस यांनी केला. त्यासंदर्भात अनेक प्रयत्न संजय पांडे आणि काही लोकांनी केले होते. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत.

वळसे पाटील यांनी आरोप फेटाळले

या आरोपानंतर दिलीप वळसे पाटील माध्यमांसमोर आले. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची कोणतीही रणनीती नव्हती. असं वळसे पाटील म्हणाले. वळसे पाटील यांचा त्यात हात नसून, त्यांना वरून आदेश होते. असं फडणवीस यांचं म्हणणं आहे.

कुठलाही प्रयत्न किंवा अशा प्रकारची योजना महाविकास आघाडीच्या सरकारची नव्हती. त्यामुळं ही गोष्ट खरी नाही. त्यांनी त्यांच्या माहितीच्या आधारावर बोलले असतील. पण, मला जी माहिती आहे. त्यानुसार राज्य सरकारनं असं काही केलं नाही, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मला अटक करण्याचा आदेश वरून होता

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटील यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही. मला अटक करण्याचा आदेश हा वळसे पाटील यांचा नव्हता. तो वरून आलेला आदेश होता.

अनिल देशमुख, नवाब मलिक या दोन नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. विधानसभेत पेन ड्राईव्ह बाँब टाकून फडणवीस यांनी सरकारला घेरलं होतं. त्यामुळं आपल्याला अडकविण्यासाठी डाव रचला गेला होता, असा दावा फडणवीस यांनी केला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...