Eknath Shinde : पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट, रामायण महाभारत कुणी घडवलं?

आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागयचो. मात्र मधली लोक दादा देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असा आरोप गोगावले यांनी केला. त्याचवेळी  शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांही फोनवर आल्या, त्यांनी गोगावलेंना एकच सवाल केला.

Eknath Shinde  : पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट, रामायण महाभारत कुणी घडवलं?
पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट,Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:35 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत बंडखोर आमदारांना आज पहिल्यांदा थेट इशारा दिला. माझ्या फोटोशिवाय आणि शिवसेनेच्या नावाशिवाय जगून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde) दिलं. तसेच माझ्याकडची खातीही तुम्हीला दिली, राठोडांवर आरोप होऊनही संभाळून घेतलं म्हणत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र त्यावर आता लगेच आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतिक्रिया आली. साहेब मुख्यमंत्री झाल्याननंतर जी काही दरी निर्माण झाली. त्यावेळी कोणतर हवं होतं. आदित्यही गुंतून गेले. हेही गुंतून गेले, आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागयचो. मात्र मधली लोक दादा देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असा आरोप गोगावले यांनी केला. त्याचवेळी  शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांही फोनवर आल्या, त्यांनी गोगावलेंना एकच सवाल केला. तर गोगावलेंना किशोरी पेडणेकरांचा आवाज ऐकताच थेट फोनच कट केला.

कोणत्या प्रश्नावर फोन कट केला?

मधल्या लोकांमुळे एवढं सगळं रामायण महाभारत घडलं, असे गोगावले म्हणत होते. मात्र त्याचवेळी किशोरी पेडणेकर हा संवाद फोनवर ऐकत होत्या. त्यांना गोगावलेंना पहिलाच सवाल हे रामायण महाभारत कोणी केलं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर गोगावलेंनी प्रतिक्रिया देण्याचं टाळत फोन ठेवला. तर संवाद नव्हता तर कॅबिनेटमध्ये काय होत होतं, आरोप करून भाजपबरोबर जायचंच ठरवलं आहे. पक्षप्रमुखावर अविश्वास दाखवायचाच आहे. मग कोण आहे यामागे? असा सवालही त्यानंतर पेडणेकरांनी गोगावलेंना केला.

गुवाहाटीला जाऊन बसाची वेळ का आली?

तसेच आम्ही संवाद एकनाथ शिंदे साहेबांशी करतोय. शिंदे साहेब खूपच दीर गंभीर शिवसेनेचे नेते आहेत. महिला आणि सर्वच एक वेगळ्या याने त्यांच्याकडे बघताय. म्हणे बंड नको, दोन आमदार निघून आले ते सांगत आहेत ना, काय पद्धतीने ते ठेवत आहेत, ते खरं असणार. उद्धवजी आहेत. ते मान सन्मान दिला आहे म्हणून तुम्हाला त्यांची खाती मिळाली. आम्ही विनवण्या केल्या. समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या गुजरातने तिरस्कार दाखवला. त्या गुजरातमध्ये का गेला. दोन हजार किलोमीटर लांब गुवाहाटीला जाऊन राहायची वेळ का आली. म्हणून साहेब हे बाळा बंड नको, बोलत आहेत. आता तुम्ही ज्या पक्षाबरोबर जोऊ इच्छिता त्या पक्षात सर्व अलबेल होणार आहे का? असा सवालही भाजपसोबत जाऊ इच्छिणाऱ्या शिंदेंना पडणेकरांना केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.