AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निधी वाटपात सगळ्यात जास्त निधी या आमदाराला मिळाला; मुख्यमंत्र्यांनी भरसभेत थेट नावच सांगितले…

राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर परिस्थिती भयानक बनली होती. त्यामुळे त्यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अडीच वर्षे सर्व काही बंद होते.

निधी वाटपात सगळ्यात जास्त निधी या आमदाराला मिळाला; मुख्यमंत्र्यांनी भरसभेत थेट नावच सांगितले...
| Updated on: Jan 26, 2023 | 10:55 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यानंतर सभांचा आणि कार्यक्रमांचा मोठा धडाका लावला आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा आणि कार्यक्रम होत आहेत. त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि तत्कालिन महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामावरही टीका केली.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राज्यातील सर्व काही बंद होते. मात्र आमचं सरकार आलं नसतं तर सगळं बंद झालं असते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

निधी वाटपाबाबतही एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याबद्दल सांगत सगळ्या जास्त निधी हा प्रताप सरनाईक यांना दिला असल्याची कबुलीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांच्याबद्दल गौरव करताना ते म्हणाले की, तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामं गेल्या काही वर्षात झालेली आहेत,

मात्र मला वाटते की, मतदार संघात प्रताप सरनाईक यांच्याकामाएवढी कोणत्याही मतदार संघात कामं झाली नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचे संकट राज्यावर आले. त्याचा फटका राज्याला मोठ्या प्रमाणात बसला होता.

त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातूनच राज्यावर लक्ष ठेवत कोरोना संकटाचा सामना करण्यास लोकांना मदत केली.

राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर परिस्थिती भयानक बनली होती. त्यामुळे त्यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अडीच वर्षे सर्व काही बंद होते,

आमचं सरकार आलं नसतं तर सगळं बंद झालं असतं कारण चायनामध्ये कोरोना आला होता असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.