AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं Image Credit source: t v 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 29, 2022 | 9:19 PM
Share

Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : उच्च न्यायालयात लढाई सुरू झाली आहे. ही लढाई 16 सदस्यांच्या अपात्रतेची आहे. 16 सदस्यांच्या बाबतीत निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाविषयी चर्चा होऊ शकते, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. सदस्यांच्या अपात्रतेसाठी अर्ज विधानसभेच्या अध्यक्षांकडं सादर करण्यात आलंय. ते लोकं शिवसेनेविषयी कसं लढू शकतात, हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे. याचा निकाल आधी लागू द्या. नंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हाविषयी चर्चा होऊ शकते. या सगळ्या बाबी कायदेशीर दृष्या समोर येईल.त्याशिवाय निवडणूक आयोग काही निर्णय घेईल, असं मला वाटतं नाही, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना ही जनतेची ताकद आहे. त्यासाठी कोणतंही प्लॅन करण्याची गरज नाही. पहिला आशीर्वाद हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाचं असेल. आई, बाप यांच्या विरोधात लढणारे हे गद्दार आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलंय. हे भाजपचं पाप राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही, असंही दानवे म्हणाले.

मिंध्या शिवसेनेसोबत किती लोकं गेले हे आम्हाला माहीत आहे. आम्ही ठाण्यात जाऊन आलो. लाभार्थी, कंत्राटदार, धनदांडगे लोकं हे त्यांच्यासोबत गेले. बाकी सामान्य कार्यकर्ता हा खऱ्या शिवसेनेसोबत आहे.

रश्मी ठाकरे या ठाण्यात गेल्या. देवीचं दर्शन त्यांनी घेतलं. यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीसोबत आले होते. तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत विरोध नोंदवायला पाहिजे होता. पण, तसा त्यांनी विरोध केला नाही. त्यामुळं त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता स्पष्ट होत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेनेचा मेळावा हा शक्तिप्रदर्शनाचा भाग नसतो. हा विचाराचं सोनं लुटण्याचा प्रसंग आहे. उद्धव ठाकरे हे विचाराचं सोनं लुटतील. हे त्यांचे विचार राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक असं असेल, असंही दानवे यांनी सांगितलं.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....