AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 29, 2022 | 9:19 PM
Share

Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : उच्च न्यायालयात लढाई सुरू झाली आहे. ही लढाई 16 सदस्यांच्या अपात्रतेची आहे. 16 सदस्यांच्या बाबतीत निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाविषयी चर्चा होऊ शकते, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. सदस्यांच्या अपात्रतेसाठी अर्ज विधानसभेच्या अध्यक्षांकडं सादर करण्यात आलंय. ते लोकं शिवसेनेविषयी कसं लढू शकतात, हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे. याचा निकाल आधी लागू द्या. नंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हाविषयी चर्चा होऊ शकते. या सगळ्या बाबी कायदेशीर दृष्या समोर येईल.त्याशिवाय निवडणूक आयोग काही निर्णय घेईल, असं मला वाटतं नाही, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना ही जनतेची ताकद आहे. त्यासाठी कोणतंही प्लॅन करण्याची गरज नाही. पहिला आशीर्वाद हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाचं असेल. आई, बाप यांच्या विरोधात लढणारे हे गद्दार आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलंय. हे भाजपचं पाप राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही, असंही दानवे म्हणाले.

मिंध्या शिवसेनेसोबत किती लोकं गेले हे आम्हाला माहीत आहे. आम्ही ठाण्यात जाऊन आलो. लाभार्थी, कंत्राटदार, धनदांडगे लोकं हे त्यांच्यासोबत गेले. बाकी सामान्य कार्यकर्ता हा खऱ्या शिवसेनेसोबत आहे.

रश्मी ठाकरे या ठाण्यात गेल्या. देवीचं दर्शन त्यांनी घेतलं. यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीसोबत आले होते. तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत विरोध नोंदवायला पाहिजे होता. पण, तसा त्यांनी विरोध केला नाही. त्यामुळं त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता स्पष्ट होत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेनेचा मेळावा हा शक्तिप्रदर्शनाचा भाग नसतो. हा विचाराचं सोनं लुटण्याचा प्रसंग आहे. उद्धव ठाकरे हे विचाराचं सोनं लुटतील. हे त्यांचे विचार राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक असं असेल, असंही दानवे यांनी सांगितलं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.