AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं Image Credit source: t v 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 29, 2022 | 9:19 PM
Share

Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : उच्च न्यायालयात लढाई सुरू झाली आहे. ही लढाई 16 सदस्यांच्या अपात्रतेची आहे. 16 सदस्यांच्या बाबतीत निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाविषयी चर्चा होऊ शकते, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. सदस्यांच्या अपात्रतेसाठी अर्ज विधानसभेच्या अध्यक्षांकडं सादर करण्यात आलंय. ते लोकं शिवसेनेविषयी कसं लढू शकतात, हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे. याचा निकाल आधी लागू द्या. नंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हाविषयी चर्चा होऊ शकते. या सगळ्या बाबी कायदेशीर दृष्या समोर येईल.त्याशिवाय निवडणूक आयोग काही निर्णय घेईल, असं मला वाटतं नाही, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना ही जनतेची ताकद आहे. त्यासाठी कोणतंही प्लॅन करण्याची गरज नाही. पहिला आशीर्वाद हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाचं असेल. आई, बाप यांच्या विरोधात लढणारे हे गद्दार आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलंय. हे भाजपचं पाप राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही, असंही दानवे म्हणाले.

मिंध्या शिवसेनेसोबत किती लोकं गेले हे आम्हाला माहीत आहे. आम्ही ठाण्यात जाऊन आलो. लाभार्थी, कंत्राटदार, धनदांडगे लोकं हे त्यांच्यासोबत गेले. बाकी सामान्य कार्यकर्ता हा खऱ्या शिवसेनेसोबत आहे.

रश्मी ठाकरे या ठाण्यात गेल्या. देवीचं दर्शन त्यांनी घेतलं. यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीसोबत आले होते. तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत विरोध नोंदवायला पाहिजे होता. पण, तसा त्यांनी विरोध केला नाही. त्यामुळं त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता स्पष्ट होत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेनेचा मेळावा हा शक्तिप्रदर्शनाचा भाग नसतो. हा विचाराचं सोनं लुटण्याचा प्रसंग आहे. उद्धव ठाकरे हे विचाराचं सोनं लुटतील. हे त्यांचे विचार राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक असं असेल, असंही दानवे यांनी सांगितलं.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर