AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?
अनिल देशमुख
| Updated on: Dec 28, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, न्यायालयानं काल दिलेला निकाल बोलका आहे. आरोपी असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

>

अनिल देशमुख यांची सुटका झाली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेकडं उशीर होत असला तरी न्याय मिळतो. देर आये लेकिन दुरुस्त आये, असा आजचा प्रकार होतोय. राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडीनं अनिल देशमुख हे काम करतील, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेली तेरा महिने कुणीच भरून काढणार नाही. अतिशय बोलका निकाल देणारं न्यायालय आपण काल पाहिलं. या तेरा महिन्यांची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताही आरोप सिद्ध न होता १३ महिने अटक होते. हे फक्त भारतातचं घडू शकतं. या सर्व गोष्टींचा निषेध करत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.