AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?
अनिल देशमुख
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 28, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, न्यायालयानं काल दिलेला निकाल बोलका आहे. आरोपी असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

>

अनिल देशमुख यांची सुटका झाली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेकडं उशीर होत असला तरी न्याय मिळतो. देर आये लेकिन दुरुस्त आये, असा आजचा प्रकार होतोय. राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडीनं अनिल देशमुख हे काम करतील, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेली तेरा महिने कुणीच भरून काढणार नाही. अतिशय बोलका निकाल देणारं न्यायालय आपण काल पाहिलं. या तेरा महिन्यांची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताही आरोप सिद्ध न होता १३ महिने अटक होते. हे फक्त भारतातचं घडू शकतं. या सर्व गोष्टींचा निषेध करत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ