AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?
अनिल देशमुख
| Updated on: Dec 28, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, न्यायालयानं काल दिलेला निकाल बोलका आहे. आरोपी असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

>

अनिल देशमुख यांची सुटका झाली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेकडं उशीर होत असला तरी न्याय मिळतो. देर आये लेकिन दुरुस्त आये, असा आजचा प्रकार होतोय. राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडीनं अनिल देशमुख हे काम करतील, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेली तेरा महिने कुणीच भरून काढणार नाही. अतिशय बोलका निकाल देणारं न्यायालय आपण काल पाहिलं. या तेरा महिन्यांची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताही आरोप सिद्ध न होता १३ महिने अटक होते. हे फक्त भारतातचं घडू शकतं. या सर्व गोष्टींचा निषेध करत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...