AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास का?
अनिल देशमुख
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 28, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, न्यायालयानं काल दिलेला निकाल बोलका आहे. आरोपी असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणावं, यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

>

अनिल देशमुख यांची सुटका झाली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेकडं उशीर होत असला तरी न्याय मिळतो. देर आये लेकिन दुरुस्त आये, असा आजचा प्रकार होतोय. राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडीनं अनिल देशमुख हे काम करतील, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेली तेरा महिने कुणीच भरून काढणार नाही. अतिशय बोलका निकाल देणारं न्यायालय आपण काल पाहिलं. या तेरा महिन्यांची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताही आरोप सिद्ध न होता १३ महिने अटक होते. हे फक्त भारतातचं घडू शकतं. या सर्व गोष्टींचा निषेध करत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ