AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा

मुंबई : आता देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वे आता सर्व रेल्वे स्टेशनचं रुपांतर डिजीटल हबमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक स्टेशनवर युजर्सला जलद इंटरनेट सेवा मिळेल. यासाठी प्रयत्न करत आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे काम पूर्ण करत आहे. हे काम तब्बल 1000 रेल्वे स्टेशनवर करण्यात येणार आहे. […]

देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई : आता देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वे आता सर्व रेल्वे स्टेशनचं रुपांतर डिजीटल हबमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक स्टेशनवर युजर्सला जलद इंटरनेट सेवा मिळेल. यासाठी प्रयत्न करत आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे काम पूर्ण करत आहे. हे काम तब्बल 1000 रेल्वे स्टेशनवर करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनला डिजीटल हबमध्ये बदलण्यासाठी आम्ही प्रत्येक स्टेशनवर हायस्पीड वायफाय बसवत आहे. याची सुरुवात 2016 ला मुंबई सेंट्रल स्टेशनपासून झाली आहे. मुंबई सेंट्रल हे पहिलं स्टेशन आहे इथे जलद आणि मोफत रेल्वे वायफाय सुविधा देण्यात आली आहे. हे काम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केलं आहे. यामध्ये आम्ही एकूण 1000 स्टेशन कव्हर करणार आहे, अशी माहिती रेलटेलकडून देण्यात आली.

रेलटेलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, डिजीटल हब उपक्रमात मुंबईच्या सेंट्रल हार्बर लाइनवरील एक रेल्वे स्टेशन असेल जे 1000 स्टेशनमधील सर्वात शेवटचं स्टेशन असेल आणि या  स्टेशनलाही मोफत वायफाय सर्व्हिस दिली जाणार आहे. तसेच हे नेटवर्क देशातील दुसऱ्या स्टेशनवरही पोहचवण्याचे काम सुरु आहे. आम्ही हाय स्पीड इंटरनेटच्या मदतीने गाव आणि शहरातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

रेलेटेलच्या या उपक्रमामुळे नक्कीच याचा जास्त फायदा प्रवाशांना होऊ शकतो. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात डिजीटल माध्यमांत प्रगती झाली आहे. तसेच प्रत्येकजण आज स्मार्टफोनचा वापर करत आहे आणि आपली प्रत्येक काम स्मार्टफोनद्वारे करत असतो. यामध्ये इंटरनेटचीही तितकीच गरज भासू लागली आहे. रेलटेलच्या उपक्रमामुळे नक्कीच याचा फायदा प्रवाशांना आणि रेल्वे प्रशासनाला होईल.

Follow Us
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.