AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..
Maharashtra Weather
| Updated on: Apr 25, 2026 | 7:14 AM
Share

मागील चार दिवसात हवामानात मोठा बदल झाला. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. मुंबईमध्ये रात्री काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पुढील 24 तास मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. अमरावती येथे 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. परभणी, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सतत बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर व परिसरात अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू आणि पाऊस अशी स्थिती होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.

अकोला शहरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाने पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने अकोला ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख निर्माण करत आहे… तर आठवडाभरापूर्वीही तापमान 45 अंशांवर गेले होते, आणि आज पुन्हा त्याच पातळीची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज यंदातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून प्रशासन सतर्क झाले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत विनाकारण बाहेर पडू नये, पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.