AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मंत्रालय मिळालं, मंत्र्याचं काय सांगता;” बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. कारण मंत्र्यांचं प्रमाण कमी झालं म्हणजे कामाचं प्रमाणही कमी होते. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांचेही आहे.

मंत्रालय मिळालं, मंत्र्याचं काय सांगता; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू
| Edited By: | Updated on: Feb 03, 2023 | 6:21 PM
Share

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि सर्व आमदार शिवसेनेत राहिले असते, तर कोर्टाचा वेळ वाचला असता, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी म्हंटलं. मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांनी घेतलं. पण, पक्षावर दावा करायला नको होता, असं जनमत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. लोकांना असं वाटतं की, शिवसेनेत थांबले असते तर कदाचित कोर्ट कचेऱ्यांतील वेळ वाचला असता. बच्चू कडू म्हणाले, मी टेक्निकली माहिती घेतली. ४० आमदार, खासदार आणि संघटन चालविणं कठीण असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदाचित पक्षाचं चिन्ह घेण्याचा निर्णय घेतला असावा.

माझी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली नाही. पण, मी माझ्या मनातील बोललो की, शिंदे आणि आमदार यांनी शिवसेनेत थांबायला हवे होते.

भाजपसोबत काम करत असताना शिंदे गटाची गळचेपी होते असे आपल्याला वाटते का, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, अंतर्गत राजकारण काय आहे, ते मला माहीत नाही. असं होण्याचं काही कारण नाही.

मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. कारण मंत्र्यांचं प्रमाण कमी झालं म्हणजे कामाचं प्रमाणही कमी होते. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांचेही आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांकडेही पाच-सहा खाती आहेत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हवेत

एक पालक आणि चार जिल्हे हे चित्र आहे. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असल्यास लोकं त्यांना भेटतात. तेवढे काम लोकांचे होतात. बच्चू कडू मंत्रिमंडळात असतील का, यावर बच्चू कडू म्हणाले, तुम्ही आमची शिफारस घेऊन जा. मला अपंग मंत्रालय मिळालं. मला मंत्र्याचं काय सांगता, असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला.

अपंग मंत्रालय मिळाल्याचा आनंद

आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे. याचा आनंद आहे. यासाठी आम्ही उठाव केला होता. आमचा निर्णय लोकांना कडू वाटला असेल. पण, दिव्यांग मंत्रालय देऊन सरकारनं आमचा उठाव गोड केलेला असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...