AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल वादळ सरकारला घाम फोडणार; किसान सभेनं नेमका इशारा काय दिला…

सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशारा किसान सभेनं दिला आहे. यावेळी कांद्याला 600 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

लाल वादळ सरकारला घाम फोडणार; किसान सभेनं नेमका इशारा काय दिला...
| Updated on: Mar 13, 2023 | 11:30 PM
Share

नाशिक : एकीकडे अवकाळी पावसाचे संकट तर दुसरीकडे शेतमाला योग्य बाजारभाव नाही. या अशा परिस्थितीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र शेतकरी आत्महत्या याआधीही होत होत्या या विधानावरून सरकारची शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता काय आहे हे दाखवून दिले आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यातच किसान सभेने नाशिक-मुंबई असा लाँग मार्च काढून सरकारला घेरण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता उद्या धडकणाऱ्या किसान मोर्चाच्या लाल वादळ आंदोलनाला सरकारतर्फे आता सामोरे कोण जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर किसान सभेने मात्र आपल्या 12 मागण्यांवर ठाण राहून त्यावरून सरकारला घेरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईकडे येणारे लाल वादळ आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानावरून आता राजकारण तापले आहे. तर कांदा उत्पादकांना सरकारने 300 रुपये अनुदानाची घोषणा केली आहे.

मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचे टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता किसान सभेने 12 मागण्यांसाठी लाँग मार्च काढून सरकारला अडचणीत आणले आहे.

किसान सभेने सांगितले आहे की, आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

कांदा उत्पादकांना दिलेली सरकारची ही मदत तुटपुंजी असल्याची टीकाही होऊ लागली आहे. त्यामुळे आता शेतमाल फेकून देत सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे.

त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या याआधीही करत होते या विधानावरूनही विरोधकांनी असंवेदनशील सरकार असल्याचा आरोपही केला आहे.

त्यामुळे आता सरकारने तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशारा किसान सभेनं दिला आहे. यावेळी कांद्याला 600 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तर किमान 200 च्या दराने नाफेडमार्फत कांदा खरेदी करा, कसणाऱ्यांच्या ताब्यातील 4 हेक्टर पर्यंतची वन्यजमीन नावावर करा, शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध करा, पीकविमा कंपन्याना लगाम घालून लूट थांबवा, सोयाबीन,कापूस आणि हरभऱ्याचे भाव पाडण्याचे कारस्थानं थांबवा अशा एकूण 14 मागण्या किसान सभेने सरकारने केल्या आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.