AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे.

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई : बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ आज रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढेल. पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी केले आहे. (Gulab storm expected to hit Gopalpur, Kalingapatnam at midnight today; Chance of heavy rains in Maharashtra)

हिंगोली सलग सहाव्या दिवशी जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात सलग आज सहाव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत होत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांमध्ये व्यत्यय येत आहे तर उभ्या असलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. कापूस, तूर या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सोलापूरमधील बोरी नदीला पूर, परिसरातील गावांचा संपर्क तुटला

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, या पावसाने ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. यामुळे बळीराजाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

बीडमध्ये माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पुसरा नदीला पूर आला. यामुळे पुसरा, तिगाव, चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यालाही पावसाने झोडपले आहे. (Gulab storm expected to hit Gopalpur, Kalingapatnam at midnight today; Chance of heavy rains in Maharashtra)

इतर बातम्या

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Release Dates : ‘पृथ्वीराज’ पासून ते ‘हिरोपंती 2’ पर्यंत एकापाठोपाठ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतील ‘हे’ चित्रपट

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....