AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट, भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी वाढणार?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत, त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी कधी होणार? या संदर्भात उद्या मुंबई उच्च न्यायालयात निश्चित होणार आहे.

राज्यपाल यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट, भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Chetan Patil | Updated on: Nov 29, 2022 | 9:33 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत, त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी कधी होणार? या संदर्भात उद्या मुंबई उच्च न्यायालयात निश्चित होणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात यावे, याकरिता निर्णय घेण्यासाठी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी, अशी मागणी करत फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.

याचिकाकर्ते दीपक जगदेव यांनी अॅड नितीन सातपुते यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने यावर उद्या मेंशन करण्याचा निर्देश वकील नितीन सातपुते यांना दिला आहे. वकील नितीन सातपुते उद्या मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर मेंशन करत उद्या सुनावणी संदर्भात मागणी करणार आहेत.

काय आहे याचिकेत?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्ते दीपक जगदेव यांच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे.

“राज्यपाल यांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कारवाई राज्यपाल यांच्या विरोधात करण्यात यावी. याकरिता उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय देण्यात यावा”, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात देखील राज्यपाल यांनी आक्षेपार्य विधान केलं होतं.

या सर्व मुद्द्यावरून विरोधी पक्षांसह अनेक संघटनांसह सर्वसामान्य जनता देखील आक्रमक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. तर इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतर्फे राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता राज्यपाल यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मागील आठवड्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी संदर्भात मागणी याचिकाकर्ते यांच्यावतीने करण्यात येईल.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन