AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाही’, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खरंतर, दक्षिण मुंबईत रात्री एक तरुण रस्त्यावर फिरत होता. त्याने तोंड रुमालाने झाकल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. असा आरोप गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

'मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाही', न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरा बाहेर पडणे गुन्हा नाहीImage Credit source: (Image Google)
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 2:03 PM
Share

मुंबई-  मुंबई – दिल्ली (Mumbai – Delhi) सारखी मोठ मोठी शहरं (Big cities) रात्रंदिवस जागीच असतात. रात्रीच्या कोणत्याही वेळी अगदी मध्य रात्री (Mid Night) सुद्धआ लोक रस्त्यावर दिसतात. पण कधी कधी रात्री उशिरा फिरणाऱ्यांना. कायदेशीर कारवाईलाही (Legal action) सामोरे जावे लागते. अशाच एका प्रकरणात मुंबईच्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय आला आहे.

रात्री उशिरा फिरणे आणि चेहरा लपवणे या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच, न्यायालयाने आपल्या निर्णयात केलेल्या टिप्पणीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणे हा गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रकरण काय होते?

ही घटना दक्षिण मुंबईतील आहे. 13 जून रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी 29 वर्षीय सुमित कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122-ब अंतर्गत या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याल आला. कोणीही गुन्हा करण्याच्या उद्देशाने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान चेहार झाकतो, त्यासाठी हे कलम लागू पडते. त्यानंतर हे प्रकरण गिरगाव दंडाधिकाऱ्य़ांच्या न्यायालयात पोहोचले. तिथे हे प्रकरण पोहचले असता याप्रकरणात पोलिस अपयशी ठरले. त्यानंतर न्यायालयाने 16 जून रोजी निकाल देताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

आदेशात म्हटले आहे

न्यायदंडधिकाऱ्यांनी  म्हंटलं आहे, मुंबईसारख्या शहरात रात्री दीड ही काही फार उशीराची वेळ नाही. रसत्यावर कोणीही उभे राहू शकते. त्यामुळे त्याने काहीतरी गुन्हा करण्यासाठी चेहरा लपवला हे मानता येणार नाही. रात्री 1.30 ची वेळ खूप उशिर आहे असं जरी गृहीत धरलं तरी, कर्फ्यू लागू नसेल. तर रसत्यावर फिरणे हा गुन्हा नाही. मुंबईत रात्री कर्फ्यू नसल्याने रस्त्यावर उभे रहिल्यास तो गुन्हा ठरत नाही.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.